शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

स्मशानभूमीसाठी संतापलेल्या गावकऱ्यांनी केला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर मृतदेह घेऊन आंदोलन करण्यात आले. नेहमीच जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार करून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहदा : कळंब तालुक्यातील किन्हाळा येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची स्माशनभूमी नाही. ज्यांच्याकडे स्वत:ची शेतजमीन आहे, ते स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करतात. भूमिहीनांना मात्र अडचण निर्माण होते. स्मशानभूमी तयार केली जावी, अशी मागणी वारंवार लावून धरण्यात आली. याची दखल प्रशासनाने घेतली नाही. रविवारी गावातील महिलेच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पांढरकवडा महामार्ग रोखून धरला. सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर मृतदेह घेऊन आंदोलन करण्यात आले. नेहमीच जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार करून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. सकाळी १० वाजेपासून महामार्गावर लाकडी ओंडके, टायर जाळून रस्ता वाहतूक बंद केली. आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे, उपनिरीक्षक सिडाम,  बीट जमादार शेखदार, जंगले, बोकडे, ग्रामसेवक सोनपराते, तलाठी डोळस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या प्रश्नांचे उत्तर या कर्मचाऱ्यांकडे नव्हते. गावात ८० आर जमीन आहे. तेथे स्मशानभूमी केली जाऊ शकते हा प्रस्तावही अनेकदा देण्यात आला. मात्र,  या प्रस्तावाचा फायलीतील प्रवास काही केल्या संपला नसल्याचा आरोप करीत रोष व्यक्त केला. 

अन्‌ अधिकारी झाले निरुत्तर- यामुळे अधिकाऱ्यांचीही दाणादाण उडाली. अखेर या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आली. लवकरात लवकर स्मशानभूमी शेड उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन देण्यात  आले, तसेच माजी मंत्री प्रा. डॉ. आमदार अशोक उईके यांनी तत्काळ दहन शेडसाठी निधी दिला. 

जिल्ह्यातील बहुतांश गावात हीच स्थिती- ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यानंतरही बहुतांश गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. पावसाळ्यात तर अनेक बिकट परिस्थितीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. असा जनक्षोभ इतरही ठिकाणी उठण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :agitationआंदोलन