शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

स्मशानभूमीसाठी संतापलेल्या गावकऱ्यांनी केला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर मृतदेह घेऊन आंदोलन करण्यात आले. नेहमीच जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार करून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहदा : कळंब तालुक्यातील किन्हाळा येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची स्माशनभूमी नाही. ज्यांच्याकडे स्वत:ची शेतजमीन आहे, ते स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करतात. भूमिहीनांना मात्र अडचण निर्माण होते. स्मशानभूमी तयार केली जावी, अशी मागणी वारंवार लावून धरण्यात आली. याची दखल प्रशासनाने घेतली नाही. रविवारी गावातील महिलेच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पांढरकवडा महामार्ग रोखून धरला. सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर मृतदेह घेऊन आंदोलन करण्यात आले. नेहमीच जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार करून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. सकाळी १० वाजेपासून महामार्गावर लाकडी ओंडके, टायर जाळून रस्ता वाहतूक बंद केली. आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे, उपनिरीक्षक सिडाम,  बीट जमादार शेखदार, जंगले, बोकडे, ग्रामसेवक सोनपराते, तलाठी डोळस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या प्रश्नांचे उत्तर या कर्मचाऱ्यांकडे नव्हते. गावात ८० आर जमीन आहे. तेथे स्मशानभूमी केली जाऊ शकते हा प्रस्तावही अनेकदा देण्यात आला. मात्र,  या प्रस्तावाचा फायलीतील प्रवास काही केल्या संपला नसल्याचा आरोप करीत रोष व्यक्त केला. 

अन्‌ अधिकारी झाले निरुत्तर- यामुळे अधिकाऱ्यांचीही दाणादाण उडाली. अखेर या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आली. लवकरात लवकर स्मशानभूमी शेड उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन देण्यात  आले, तसेच माजी मंत्री प्रा. डॉ. आमदार अशोक उईके यांनी तत्काळ दहन शेडसाठी निधी दिला. 

जिल्ह्यातील बहुतांश गावात हीच स्थिती- ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यानंतरही बहुतांश गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. पावसाळ्यात तर अनेक बिकट परिस्थितीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. असा जनक्षोभ इतरही ठिकाणी उठण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :agitationआंदोलन