शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थाळीनाद

By admin | Updated: October 29, 2015 02:55 IST

तालुक्यातील पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करून शेतकऱ्यांना पीक विम्यासह शासकीय सोयी देण्यात याव्या,

दुष्काळ जाहीर करा : शासनाच्या धोरणाचा निषेध, संपूर्ण कर्जमाफीची मागणीउमरखेड : तालुक्यातील पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करून शेतकऱ्यांना पीक विम्यासह शासकीय सोयी देण्यात याव्या, या मागणीसोबतच वीज वितरणचा अनागोंदी कारभाराचा निषेध करून जिल्ह्यात महागाई व दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी थाळीनाद आंदोलन केले.यावर्षी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णत: उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. अशा परिस्थितीत वीज विभागाकडून भारनियमन सुरूच आहे. त्यामुळे उरले सुरले पीकही वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडे वीज नाही. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या ज्वलंत प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. शासन व प्रशासनाविरुद्ध घोषणा देऊन व्यवस्थेविषयी प्रचंड रोष व्यक्त केला.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वीज अभियंत्याला देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे मोहनराव मोरे, भीमराव पाटील चंद्रवंशी, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वानखडे, उत्तमराव राठोड यांनी निवेदन देवून अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. तसेच त्या त्वरित सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली. सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाने यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे दगा दिला. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यातूनच शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. याला शासनाचे असंवेदनशील धोरणच कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोयाबीन पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करावी, वीज वितरण कंपनीच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने विजेचा नियमित पुरवठा करण्यात यावा, पैनगंगा नदीवर साखळी बंधारे बांधण्यात यावे, दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उमरखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी प्रा.मोहनराव मोरे, माजी नगराध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल, कल्याणराव माने, शेख इसाराज, उत्तम जाधव, नगरसेवक साजीद जागिरदार, बळवंतराव चव्हाण, सिद्धेश्वर जगताप, प्रदीप पाटील देवसरकर, संजय शिंदे, अमर राठोड, डॉ.रवी चव्हाण, पांडुरंग खापरे, तुळशीराम चव्हाण, सूर्यकांत पंडित आदींसह तालुक्यातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. (शहर प्रतिनिधी)