शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे अन्य विभागांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:44 IST

रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला याबाबत गंभीर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राज्यस्तरावर निवृत्त न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत समिती कार्यरत आहे.

ठळक मुद्देअपघात प्रवणस्थळाबाबत उदासीनता : बांधकाम विभागाने निर्धारित केलेल्या सात स्थळांची सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला याबाबत गंभीर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राज्यस्तरावर निवृत्त न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत समिती कार्यरत आहे. जिल्हा स्तरावरही जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत समिती तयार केली आहे. मात्र या समितीकडे इतर विभागाने पाठ फिरविल्याचे दिसून येते.जिल्हा स्तरावरच्या रस्ते सुरक्षा समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिव तर सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग व महामार्ग पोलीस, नगरपरिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग या सर्वांनी समन्वय ठेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. परिवहन महामंडळाचाही या समितीमध्ये समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समितीने रस्ते सुरक्षाविषयक कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी १७ डिसेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते. नगरपरिषद, आरोग्य, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग या विभागातून एकही अधिकारी बैठकीला उपस्थित राहिला नाही. यावरून समितीच्या कामकाजाबाबत संबंधित विभागाचे अधिकारी फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. ही बाब जिल्हाधिकाºयांना खटकली असून सभेला गैरहजर असलेल्या सर्व विभागांच्या अधिकाºयांना कारणेदाखवा नोटीस दिली जाणार आहे. २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सात ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवणस्थळ) निवडले होते. त्यानंतर त्यातील सहा ब्लॅक स्पॉट रस्ता चौपदरीकरणाच्या कामात निघाले.वणी-वरोरा मार्गावरचा ब्लॅक स्पॉट नागपूर डिव्हीजनमध्ये येत असल्याचे अहवालात नमूद केले आणि सातही ब्लॅक स्पॉटचे काम केल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला. विशेष म्हणजे सर्वच ब्लॅक स्पॉट वणी क्षेत्रातच निवडण्यात आले. यावरून बांधकाम विभागाने केवळ टेबलवर बसून हे स्पॉट निवडल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होणारी स्थळे आहेत तेथे तातडीच्या उपाययोजना करण्याचीही गरज आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.अपघाताचा धोका असलेले जिल्ह्यात तब्बल १४ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चितसर्वाधिक अपघाताची स्थळे निवडण्यात आली आहे. त्यांना ब्लॅक स्पॉट घोषित केले आहे. एसटी महामंडळाने २०१५ च्या सर्वेक्षणानुसार वणी, मारेगाव मार्गावर जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीजवळ, चंद्रपूर-वणी मार्गावर लालपुलिया, वणी-घोन्सा मार्गावर सोला-सार्वला फाटा, वणी-घुग्गुस मार्गावर नायगाव येथील वळण रस्ता, यवतमाळ-नागपूर मार्गावर बायपास चौफुली, यवतमाळ-अमरावती मार्गावर शिंगणापूर चौफुली, यवतमाळ-दारव्हा मार्गावर भोयर नर्सरी घाट वळण, पुसद-उमरखेड मार्गावर पोफाळी साखर कारखान्याजवळचे वळण, पुसद-शेंबाळपिंपरी मार्गावर गारवाई खंडाळा घाट, दारव्हा-आर्णी मार्गावर दारव्हा येथील बायपास चौफुली,दारव्हा-दिग्रस मार्गावर वडसा नवीन वस्ती वळण रस्ता येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात, असा अहवाल दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा