शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे अन्य विभागांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:44 IST

रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला याबाबत गंभीर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राज्यस्तरावर निवृत्त न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत समिती कार्यरत आहे.

ठळक मुद्देअपघात प्रवणस्थळाबाबत उदासीनता : बांधकाम विभागाने निर्धारित केलेल्या सात स्थळांची सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला याबाबत गंभीर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राज्यस्तरावर निवृत्त न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत समिती कार्यरत आहे. जिल्हा स्तरावरही जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत समिती तयार केली आहे. मात्र या समितीकडे इतर विभागाने पाठ फिरविल्याचे दिसून येते.जिल्हा स्तरावरच्या रस्ते सुरक्षा समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिव तर सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग व महामार्ग पोलीस, नगरपरिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग या सर्वांनी समन्वय ठेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. परिवहन महामंडळाचाही या समितीमध्ये समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समितीने रस्ते सुरक्षाविषयक कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी १७ डिसेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते. नगरपरिषद, आरोग्य, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग या विभागातून एकही अधिकारी बैठकीला उपस्थित राहिला नाही. यावरून समितीच्या कामकाजाबाबत संबंधित विभागाचे अधिकारी फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. ही बाब जिल्हाधिकाºयांना खटकली असून सभेला गैरहजर असलेल्या सर्व विभागांच्या अधिकाºयांना कारणेदाखवा नोटीस दिली जाणार आहे. २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सात ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवणस्थळ) निवडले होते. त्यानंतर त्यातील सहा ब्लॅक स्पॉट रस्ता चौपदरीकरणाच्या कामात निघाले.वणी-वरोरा मार्गावरचा ब्लॅक स्पॉट नागपूर डिव्हीजनमध्ये येत असल्याचे अहवालात नमूद केले आणि सातही ब्लॅक स्पॉटचे काम केल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला. विशेष म्हणजे सर्वच ब्लॅक स्पॉट वणी क्षेत्रातच निवडण्यात आले. यावरून बांधकाम विभागाने केवळ टेबलवर बसून हे स्पॉट निवडल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होणारी स्थळे आहेत तेथे तातडीच्या उपाययोजना करण्याचीही गरज आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.अपघाताचा धोका असलेले जिल्ह्यात तब्बल १४ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चितसर्वाधिक अपघाताची स्थळे निवडण्यात आली आहे. त्यांना ब्लॅक स्पॉट घोषित केले आहे. एसटी महामंडळाने २०१५ च्या सर्वेक्षणानुसार वणी, मारेगाव मार्गावर जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीजवळ, चंद्रपूर-वणी मार्गावर लालपुलिया, वणी-घोन्सा मार्गावर सोला-सार्वला फाटा, वणी-घुग्गुस मार्गावर नायगाव येथील वळण रस्ता, यवतमाळ-नागपूर मार्गावर बायपास चौफुली, यवतमाळ-अमरावती मार्गावर शिंगणापूर चौफुली, यवतमाळ-दारव्हा मार्गावर भोयर नर्सरी घाट वळण, पुसद-उमरखेड मार्गावर पोफाळी साखर कारखान्याजवळचे वळण, पुसद-शेंबाळपिंपरी मार्गावर गारवाई खंडाळा घाट, दारव्हा-आर्णी मार्गावर दारव्हा येथील बायपास चौफुली,दारव्हा-दिग्रस मार्गावर वडसा नवीन वस्ती वळण रस्ता येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात, असा अहवाल दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा