शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा तीरावर भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:51 IST

पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे.

ठळक मुद्दे५० गावांना फटका : नळ योजनांच्या विहिरी तळाला, जनावरांचे हाल

ऑनलाईन लोकमतउमरखेड : पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे. यासाठी त्यांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे.उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावर उमरखेड तालुक्यातील आणि मराठवाड्यातील ५० गावे आहेत. या गावासाठी पैनगंगा जीवनदायी आहे. पैनगंगेच्या पाण्यावर अनेकांचे शेत ओलित होतात. तर बहुतांश गावातील नळ योजनेच्या विहिरी नदी तीरावरच आहे. पूर्वी बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा अलिकडच्या काळात हिवाळ्यातच कोरडी पडते. यंदा तर अपूऱ्या पावसाने पैनगंगेला पूर ही गेला नाही. परिणामी हिवाळ्यातच पैनगंगा करोडी पडली. त्यामुळे भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवटपिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, चिंचोलीसंगम, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, काटखेड, लोहरा, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, सिंदगी, गाजेगाव, कावळेश्वर, बिटरगाव, भोजनगर, जेवली, पेंदा, सोनदाबी, मोरचंडी, जवराळा, गाडी बोरी, मुरली, सहस्त्रकुंड, पिंपळगाव, खरबी, परोटी वन यासह अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.डिसेंबर महिन्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने पाणी टंचाईची चाहूल लागली होती. परंतु या दोन महिन्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रभावी उपाय योजना करण्यात आल्या नाही. परिणामी आता फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून या भागातील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापपर्यंत इसापूरचे पाणी नदी पात्रात सोडले नाही. धरणाचे पाणी शहरांसाठी आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पैनगंगा कोरडी पडल्याने या भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे.शासनाच्या विरोधात एल्गारपैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी नदी तीरावरील बोरी येथे विदर्भ-मराठवाड्यातील नागरिकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी हदगावचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. नागरिकांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी शासनाने पैनगंगेच्या पात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाई असतानाही प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने रोष व्यक्त केला. आमदार नागेश पाटील यांनी जनभावना लक्षात घेता शासनाच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याचे सांगितले. या बैठकीला पांडुरंग देवसरकर, तुकाराम माने, विठ्ठलराव वानखेडे, भगवान माने, धनंजय माने, डॉ. वसंतराव खंदारे, सुदर्शन रावते, प्रसाद माने, वामनराव वानखेडे, श्रीधर देवसरकर, मदन जाधव, रामराव पाटील, दादाराव पाटील, राजू माने उपस्थित होते.