शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पैनगंगा तीरावर भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:51 IST

पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे.

ठळक मुद्दे५० गावांना फटका : नळ योजनांच्या विहिरी तळाला, जनावरांचे हाल

ऑनलाईन लोकमतउमरखेड : पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे. यासाठी त्यांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे.उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावर उमरखेड तालुक्यातील आणि मराठवाड्यातील ५० गावे आहेत. या गावासाठी पैनगंगा जीवनदायी आहे. पैनगंगेच्या पाण्यावर अनेकांचे शेत ओलित होतात. तर बहुतांश गावातील नळ योजनेच्या विहिरी नदी तीरावरच आहे. पूर्वी बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा अलिकडच्या काळात हिवाळ्यातच कोरडी पडते. यंदा तर अपूऱ्या पावसाने पैनगंगेला पूर ही गेला नाही. परिणामी हिवाळ्यातच पैनगंगा करोडी पडली. त्यामुळे भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवटपिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, चिंचोलीसंगम, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, काटखेड, लोहरा, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, सिंदगी, गाजेगाव, कावळेश्वर, बिटरगाव, भोजनगर, जेवली, पेंदा, सोनदाबी, मोरचंडी, जवराळा, गाडी बोरी, मुरली, सहस्त्रकुंड, पिंपळगाव, खरबी, परोटी वन यासह अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.डिसेंबर महिन्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने पाणी टंचाईची चाहूल लागली होती. परंतु या दोन महिन्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रभावी उपाय योजना करण्यात आल्या नाही. परिणामी आता फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून या भागातील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापपर्यंत इसापूरचे पाणी नदी पात्रात सोडले नाही. धरणाचे पाणी शहरांसाठी आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पैनगंगा कोरडी पडल्याने या भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे.शासनाच्या विरोधात एल्गारपैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी नदी तीरावरील बोरी येथे विदर्भ-मराठवाड्यातील नागरिकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी हदगावचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. नागरिकांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी शासनाने पैनगंगेच्या पात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाई असतानाही प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने रोष व्यक्त केला. आमदार नागेश पाटील यांनी जनभावना लक्षात घेता शासनाच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याचे सांगितले. या बैठकीला पांडुरंग देवसरकर, तुकाराम माने, विठ्ठलराव वानखेडे, भगवान माने, धनंजय माने, डॉ. वसंतराव खंदारे, सुदर्शन रावते, प्रसाद माने, वामनराव वानखेडे, श्रीधर देवसरकर, मदन जाधव, रामराव पाटील, दादाराव पाटील, राजू माने उपस्थित होते.