शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पैनगंगा तीरावर भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:51 IST

पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे.

ठळक मुद्दे५० गावांना फटका : नळ योजनांच्या विहिरी तळाला, जनावरांचे हाल

ऑनलाईन लोकमतउमरखेड : पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे. यासाठी त्यांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे.उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावर उमरखेड तालुक्यातील आणि मराठवाड्यातील ५० गावे आहेत. या गावासाठी पैनगंगा जीवनदायी आहे. पैनगंगेच्या पाण्यावर अनेकांचे शेत ओलित होतात. तर बहुतांश गावातील नळ योजनेच्या विहिरी नदी तीरावरच आहे. पूर्वी बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा अलिकडच्या काळात हिवाळ्यातच कोरडी पडते. यंदा तर अपूऱ्या पावसाने पैनगंगेला पूर ही गेला नाही. परिणामी हिवाळ्यातच पैनगंगा करोडी पडली. त्यामुळे भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवटपिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, चिंचोलीसंगम, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, काटखेड, लोहरा, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, सिंदगी, गाजेगाव, कावळेश्वर, बिटरगाव, भोजनगर, जेवली, पेंदा, सोनदाबी, मोरचंडी, जवराळा, गाडी बोरी, मुरली, सहस्त्रकुंड, पिंपळगाव, खरबी, परोटी वन यासह अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.डिसेंबर महिन्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने पाणी टंचाईची चाहूल लागली होती. परंतु या दोन महिन्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रभावी उपाय योजना करण्यात आल्या नाही. परिणामी आता फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून या भागातील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापपर्यंत इसापूरचे पाणी नदी पात्रात सोडले नाही. धरणाचे पाणी शहरांसाठी आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पैनगंगा कोरडी पडल्याने या भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे.शासनाच्या विरोधात एल्गारपैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी नदी तीरावरील बोरी येथे विदर्भ-मराठवाड्यातील नागरिकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी हदगावचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. नागरिकांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी शासनाने पैनगंगेच्या पात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाई असतानाही प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने रोष व्यक्त केला. आमदार नागेश पाटील यांनी जनभावना लक्षात घेता शासनाच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याचे सांगितले. या बैठकीला पांडुरंग देवसरकर, तुकाराम माने, विठ्ठलराव वानखेडे, भगवान माने, धनंजय माने, डॉ. वसंतराव खंदारे, सुदर्शन रावते, प्रसाद माने, वामनराव वानखेडे, श्रीधर देवसरकर, मदन जाधव, रामराव पाटील, दादाराव पाटील, राजू माने उपस्थित होते.