शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

अटीत अडकले कर्जपुनर्गठण

By admin | Updated: June 29, 2015 00:13 IST

जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपासाठी मागितलेल्या रकमेएवढेच तारण ठेवण्याची अट राज्य सहकारी बँकेने घातल्याने ...

राज्य सहकारी बँकेचा फतवा : दोन बँकेच्या व्यवहारात शेतकरी संकटात यवतमाळ : जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपासाठी मागितलेल्या रकमेएवढेच तारण ठेवण्याची अट राज्य सहकारी बँकेने घातल्याने जिल्ह्यातील कर्जपुनर्गठण रखडले आहे. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरिपाच्या तोंडावर अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून परिचित असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पीक कर्ज वाटपासाठी सध्या पैसे नाही. त्यामुळे राज्य सहकारी बँकेकडे ३४० कोटींची मागणी केली. मात्र राज्य सहकारी बँकेने २३० कोटी देऊन तितक्याच रुपयांच्या तारण ठेवी निर्माण करण्याची अट जिल्हा बँकेला घातली. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी पीक कर्ज पुनर्गठनापासून वंचित आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कर्ज वाटपाचे ६६४ कोटींचे उद्दीष्ट होते. जिल्हा बँकेला शक्य झाले तेवढ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले. राष्ट्रीयकृत बँका अद्यापही कर्ज पुनर्गठनासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दोन बँकांच्या व्यवहारामध्ये शेतकरी भरडला जात आहे. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली आहे. राज्य सहकारी बँकेने तारण ठेवीची अट शिथिल करून जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेला वित्तपुरवठा करावा, जेणे करून शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप करता येईल अशी मागणी केली आहे. बँकांनी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे गेल्या सहा वर्षात बँकेचे एक लाखाच्यावर सभासद कमी झाले. २००९ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक लाख ७१ हजार इतके कर्जदार सभासद होते. त्यावेळी कर्जाची टक्केवारी १४० टक्के इतकी होती. आज मात्र बँकेच्या सभासदांची संख्या ४२ हजारावर आली असून, कर्जाची टक्केवारी ६० टक्के इतकी आहे. ही धक्कादायक बाब राज्य खरीप हंगाम आढावा बैठकीत पुढे आली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बँकेची सभासद संख्या कमी का झाली यावर बैठकीत मंथन झाले होते. बँकेचे ४२ हजार नियमित खातेदार असून, उर्वरित सर्वच थकित कर्जदार आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी सरकारनेच सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री राठोड यांनी नमूद केले आहे. जिल्हा बँकेला कर्ज पुनर्गठनाकरिता तब्बल ४९३ कोटींची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने रकमेचे पुनर्गठन करून देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी ना.राठोड यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)आता कर्जपुनर्गठणासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जपुनर्गठण करण्याची ३० जून ही अंतिम तारीख होती. परंतु अनेक बँकांचे पुनर्गठण करता आले नाही. त्यामुळे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने १५ जुलैपर्यंत कर्जपुनर्गठणास मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती अग्रनी बँकेचे व्यवस्थापक जी.जी. पिंपळे यांनी दिली. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामीण बँकेला १६५३ कोटी २३ लाख रुपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात बँकांनी आतापर्यंत ६२८ कोटी रुपयांचे कर्जाचे वितरण केले. उद्दीष्टाच्या ३८ टक्केच आहे. जिल्हा बँकेने ३० हजार ७४९ शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले तर राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ सहा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले. अर्ध्याअधिक बँकांनी अद्यापही आपला अहवाल तयार केला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पुनर्गठित कर्जास मुकणार होते. परंतु आता मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्ज मर्यादा दीड लाख करावीबँकांकडून नियमित कर्जदारास ६० ते एक लाख रुपयांच्या मर्यादेत कर्ज दिले जात आहे. एक लाख रुपयावरील कर्जासाठी तारण ठेवणे आवश्यक आहे. तारण ठेवण्याकरिता २० जाचक अटी आहेत. त्याची पूर्तता करतानाच शेतकऱ्यांचे हाल होत आहे. याकारणानेच अनेक शेतकारी पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे पीक कर्ज मर्यादा दीड लाख रुपये करून विनातारण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला आहे.