शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

दहावी व बारावीच्या परीक्षेचे यंदा लोकवाहिनीला टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सचिवांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे. त्यानुसार महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर जाण्या-येण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मागणी व आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना बसेस उपलब्ध करून द्याव्यात, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. दैनंदिन फेऱ्या सोडण्यासाठीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दैनंदिन बसफेऱ्याच चालविण्यासाठी एसटी महामंडळाकडे चालक, वाहकांचा तुटवडा आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर बसेस मार्गावर सोडण्याचा प्रश्न आहे. असे असतानाच दहावी, बारावीच्या परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना केल्या आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च व एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेला सुरुवातही झाली आहे. या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठी सर्कस करावी लागत आहे. गावातून बस नसल्याने खासगी अथवा वैयक्तिक वाहनाने परीक्षा केंद्र जवळ करावे लागत आहे. हीच परिस्थिती लेखी परीक्षा सुरू झाल्यानंतर होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संप सुरू होण्यापूर्वी विविध मार्गांवर विद्यार्थ्यांसाठी मानव विकास मिशनच्या ४५, तर इतर ६५ बसेसची व्यवस्था होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सचिवांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे. त्यानुसार महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर जाण्या-येण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मागणी व आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना बसेस उपलब्ध करून द्याव्यात, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. दैनंदिन फेऱ्या सोडण्यासाठीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. मागणीनुसार फेऱ्या वाढवायच्या कशा, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांशी संपर्क केला जात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नियाेजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दररोज धावतात फक्त ८५ बसेस मार्गावरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील सर्व आगारातून दररोज केवळ ८० ते ८५ बसेसच्या माध्यमातून वाहतूक केली जात आहे. त्यातही उमरखेड, दिग्रस आगारातून अनुक्रमे एक आणि चार बसेस धावत आहेत. २५ फेब्रुवारी रोजी ८१ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. १६२ फेऱ्या करून चार हजार १८३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. दैनंदिन वाहतुकीची ही परिस्थिती असताना, परीक्षा काळातील वाहतुकीचे आव्हान महामंडळापुढे आहे.

हात दाखविल्यास गाडी थांबवा- राज्य मंडळाच्या सचिवांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना पाठविलेल्या पत्रात, विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र ग्राह्य धरून प्रवासाची मुभा द्यावी, असे सूचित केले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळेचे गाव ते परीक्षा केंद्र व उपकेंद्र यासाठी विशेष गाड्या गरजेनुसार सोडाव्यात, वेळापत्रकाला अनुसरून जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल असा बदल करावा, विद्यार्थी मार्गावर दिसल्यास आणि त्याने बस थांबविण्याची विनंती केल्यास जागा करून द्यावी, आदी सूचना शिक्षण मंडळ सचिवांनी केल्या आहेत.

मुख्याध्यापकांनी भेटावे- विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी बसफेरीच्या दृष्टीने आगार व्यवस्थापकांशी संपर्क करावा. त्यादृष्टीने नियोजन करता येईल, असे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप