शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

दहा गावे आली ड्राय झोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:55 IST

दगडी भाग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अविकसीत असल्याने नागालँड म्हणविल्या जाणाºया दारव्हा तालुक्यातील डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील जवळपास दहा गावे यावर्षी अत्यल्प पावसामुळे ....

दारव्हा तालुका : सर्व पीक हातून गेले, पाण्याची भीषण समस्यालोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दगडी भाग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अविकसीत असल्याने नागालँड म्हणविल्या जाणाºया दारव्हा तालुक्यातील डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील जवळपास दहा गावे यावर्षी अत्यल्प पावसामुळे ड्राय झोनमध्ये आली आहे.या भागातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी सर्व पीक हातून गेली आहे तर आत्तापसूनच पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा या गावांमध्ये आणीबाणीची स्थिती उत्पन्न होऊ शकते, अशी भीती व्यक्त केल्या जात आहे.तोरनाळा (दगड) वागद, पिंपळखुटा, गोरेगाव, नांदगव्हाण, मांगकिन्ही, तेलगव्हाण यासह आजुबाजुच्या गावांमध्ये नेहमीच पाण्याची कमतरता असते. त्यातच यावर्षी दारव्हा तालुक्यात वार्षीक सरासरीच्या तुलनेत ५० टक्केसुद्धा पाऊस पडला नाही. त्यामुळे वरील गावांमध्ये नदी, नाले, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहे. कोरडवाहू शेतजमिनीला वरचे पाणी न मिळाल्याने खरीप हंगामातील सर्व पीक हातातून गेली. सोयाबीन करपल्याने सोंगायचेही काम नाही. कापसाला बोंड आले नाही, उडीद-मुगाचीही वाईट अवस्था झाल्यामुळे अनेक शेतकºयांनी शेती वाºयावर सोडली आहे.शेतीच्या अशा अवस्थेनंतर आता या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची काळजी वाटत आहे. सर्वात भीषण स्थिती तोरनाळा गावात निर्माण झाली आहे. टॅँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाºया जिल्ह्यातील गावांमध्ये या गावाचा वरचा क्रमांक लागतो. गावात पाण्याचा एकही स्रोत नाही. सध्या कसीबशी पाणीपुरवठा योजना दुसºया ठिकाणाहून सुरू आहे. ही योजना बंद पडली तर या गावाला १० किलोमीटरवर असणाºया बोदेगावाहून टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही तर नांदगव्हाण, पिंपळखुटा येथील योजना बंद पडल्याचे सांगण्यात आले. या परिसरात आत्तापासूनच टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे या गावांकरिता वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे. तेलगव्हाण येथील पाझर तलावात पाणी असून, आवश्यकता भासल्यास तोरनाळा गावाकरिता तेथून तात्पुरता पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. तसेच या गावात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारा व इतर कामे होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाझर तलाव मंजूर करण्याची गावकºयांची मागणी आहे. पावसाअभावी टंचाईची स्थिती निर्माण झाल्याने या गावांमधील नागरिकांनी लोकप्रतिनिधी व आधिकाºयांना भेटून निवेदन सादर केले. त्यात त्यांनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तात्काळ सर्वे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी तसेच पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी त्वरित उपाय शोधण्याची मागणी केली आहे. महत्वाचे म्हणजे पीक हातचे गेल्यामुळे लहान शेतकरी व शेतमजुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, अशी मागणी आहे.साठ वर्षांत प्रथमच भीषण दुष्काळयंत्रणेकडून दखल नाहीतोरनाळासह आजुबाजुच्या गावात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता समोर पिण्याच्या पाण्याची समस्या उभी ठाकली आहे. अशी टंचाईग्रस्त स्थिती असताना अद्याप प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेतल्याचे दिसत नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आत्तापासूनच उपाययोजना केल्यास या गावातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो.नदी, नाल्यांत ठणठणाटगेल्या साठ वर्षात पहिल्यांदाच दुष्काळाची अशी स्थिती निर्माण झाल्याचे तोरनाळा-गोरगाव ग्राम विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शेषराव राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या भागातील कोणत्याही नदी, नाल्यांना थेंबभरही पाणी नाही. पीक तर गेली आता नागरिक आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.यावर तोडगा काढण्याची मागणी आहे.