शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सोयाबीनचे दर दहा हजार; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:47 IST

तालुक्यात ५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात येत असते. चांगले उत्पन्न मिळत असल्याने दरवर्षी या क्षेत्रात वाढ ...

तालुक्यात ५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात येत असते. चांगले उत्पन्न मिळत असल्याने दरवर्षी या क्षेत्रात वाढ होत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पडलेल्या भावात सोयाबीन विकले. सुरुवातीला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला; मात्र नंतर सोयाबीनच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. शेतात सोयाबीनचे पीक उभे आहे आणि बाजारात सोयाबीनला १० हजार रुपये दर मिळत आहे. हातात शेतमाल नाही, पण सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. बाजार समितीत सोयाबीनचा दर १० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील काही दिवसांमध्ये या दरात अडीच हजार रुपयांनी वाढ झाली; मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसून, व्यापाऱ्यांना होणार असल्याचे दिसून येते. पावसाळा सुरू असल्याने शेतकऱ्यांजवळ शेतमाल शिल्लक नाही; मात्र मागील महिनाभरात सोयाबीनचे दर झपाट्याने वाढत आहेत. ही कृत्रिम तेजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा मशागतीसोबत बियाणे, खतांचे दर वाढले आहे. त्यामुळे शेतीचा खर्चही वाढला आहे. सोयाबीनची १२ एकरात पेरणी केली असून, बाजारात सध्या सोयाबीनला चांगला दर मिळतो; परंतु या दरवाढीचा फायदा नाही. जागतिक बाजारपेठेच्या दराचा शेतकऱ्यांना फायदा नाही. आता सोयाबीनला विक्रमी दर मिळत असले तरी शेतकरी सोयाबीन विकून बसले आहेत. ऐन हंगामात बाजारात शेतमालाला दर नसतो.