शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्ह्यातील शिक्षेत दहा टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी तपास अधिकाऱ्यासोबतच अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. त्याअंती जाऊन न्यायाधीशांकडून निकाल दिला जातो. बरेचदा आरोपींनाच संशयाचा फायदा मिळतो. खून, प्राणघातक हल्ला, महिलांवरील अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार यासारख्या गुन्ह्यांची २३ डिसेंबरपर्यंत २८७ प्रकरणे न्यायालयाने निकाली काढली. यात २१२ जणांची निर्दोष सुटका झाली, तर ७५ जणांना दहा वर्षे अथवा जन्मठेप अशा स्वरूपाची शिक्षा झाली आहे. याचे मागीलवर्षी प्रमाण केवळ १६.१७ टक्के होते. २०१७ मध्ये तर हे प्रमाण ११.९८ टक्केच होते.

ठळक मुद्दे७५ आरोपींना शिक्षा : चोरीसह इतर गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण घटले, २६ टक्के प्रकरणात कठोर निर्णय

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुन्हेगारांनाच न्यायालयीन प्रक्रियेत बरेचदा दिलासा मिळतो, असा समज आहे. मात्र मागील काही वर्षांत दोषसिद्धीचे प्रमाण बरेच वाढले असून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होते, असे दिसून येत आहे. वर्षभरात दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये २६.१३ टक्के प्रकरणात कठोर शिक्षा झाली आहे. यामध्ये २०१८ च्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी तपास अधिकाऱ्यासोबतच अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. त्याअंती जाऊन न्यायाधीशांकडून निकाल दिला जातो. बरेचदा आरोपींनाच संशयाचा फायदा मिळतो. खून, प्राणघातक हल्ला, महिलांवरील अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार यासारख्या गुन्ह्यांची २३ डिसेंबरपर्यंत २८७ प्रकरणे न्यायालयाने निकाली काढली. यात २१२ जणांची निर्दोष सुटका झाली, तर ७५ जणांना दहा वर्षे अथवा जन्मठेप अशा स्वरूपाची शिक्षा झाली आहे. याचे मागीलवर्षी प्रमाण केवळ १६.१७ टक्के होते. २०१७ मध्ये तर हे प्रमाण ११.९८ टक्केच होते.एकीकडे गंभीर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण वाढत असले, तरी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी स्तरावर चालणाºया खटल्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण कमी झाले आहे. २०१८ मध्ये ४२.६२ टक्के शिक्षेचे प्रमाण होते. २०१९ मध्ये हा आकडा ३४.१६ टक्क्यांवर आला आहे. एकूण नऊ हजार ५४१ प्रकरणांचा निपटारा झाला. त्यात सहा हजार २८१ निर्दोष मुक्त झाले, तर तीन हजार २६० जणांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण कमी होण्याची कारणे शोधण्याची गरज आहे. बरेचदा फिर्यादी फितूर होतो अथवा दोषारोपपत्रातही उणिवा राहतात. त्याचा फायदा आरोपींना मिळतो. यामुळेच दोषसिद्धी होण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जाते. याउलट गंभीर गुन्ह्यांबाबत दोषारोपपत्र तयार करताना पोलीस दलातील वरिष्ठांकडून सातत्याने आढावा घेतला जातो. उपविभागीय अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक यांच्या नजरेतून दोषारोपपत्र जाते. छाननी केल्यामुळे त्यातील उणीवा काढता येतात. त्याचा परिणाम न्यायालयात आरोपीला शिक्षा होण्यात होतो. अशीच पद्धत प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी स्तरावरील गुन्ह्यांच्या दोषारोपपत्राबाबत अवलंबिणे आवश्यक आहे. यात विशेष करून चोरी व मालमत्ताविषयक गुन्ह्यांचा समावेश असतो.सर्वाधिक शिक्षा अत्याचाराच्या गुन्ह्यातजिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या एकूण ७५ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणे महिला अत्याचाराची आहेत. यामध्ये ३२ प्रकरणे ही बाल लैंगिक अत्याचाराची असून ‘पोक्सो’अंतर्गत आरोपींना शिक्षा झाली आहे. महिला अत्याचाराच्या ११ गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. १६ गुन्हे खून व प्राणघातक हल्ल्याचे आहेत. यातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ही सर्व प्रकरणे मागील पाच वर्षातील असल्याने दोषसिद्धीचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक