शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

हे तर स्वातंत्र्याचे मंदिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

९ ऑगस्ट १९८१ रोजी या स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. चार दशकांचा दीर्घ काळ लोटूनही हे स्मारक तेवढेच प्रेरक आहे. वर्षागणिक स्मारकाचा परिसर अधिक देखणा केला जात आहे. गेल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त येथे वन विभागाने विशेष उपक्रम राबविला. १९३६ मध्ये गांधीजींनी सेवाग्रामच्या आश्रमात जो पिंपळवृक्षा लावला होता, त्यापासून रोप तयार करून वृक्षलागवड करण्यात आली.

अविनाश साबापुरे/रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहिदाचे स्मारक म्हणजे केवळ वास्तू नव्हे, ते भारतीय स्वातंत्र्याचे मंदिर आहे... असा जाज्वल्य अभिमान व्यक्त करतात उमरीचे गावकरी. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात महात्मा गांधीच्या प्रेरणेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान देणाऱ्या यशवंत लुडबाजी पाळेकर यांचे स्मारक या गावात गेल्या ३९ वर्षांपासून आझादीचा ओजस्वी हुंकार भरत आहे. ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने बाभूळगाव तालुक्यातील या शहीद स्मारकावर एक कृतज्ञतापूर्वक नजर...९ ऑगस्ट १९८१ रोजी या स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. चार दशकांचा दीर्घ काळ लोटूनही हे स्मारक तेवढेच प्रेरक आहे. वर्षागणिक स्मारकाचा परिसर अधिक देखणा केला जात आहे. गेल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त येथे वन विभागाने विशेष उपक्रम राबविला. १९३६ मध्ये गांधीजींनी सेवाग्रामच्या आश्रमात जो पिंपळवृक्षा लावला होता, त्यापासून रोप तयार करून वृक्षलागवड करण्यात आली. त्यामुळे या हुतात्मा स्मारकाला आता राष्ट्रपित्याच्या स्मृतींचीही सावली लाभणार आहे.बॅरिस्टर ए.आर.अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात हुतात्मा स्मारकांच्या बांधणीची संकल्पना पुढे आणली. त्यातून २०२ ठिकाणी बांधकामे पूर्ण झाली. त्यातीलच एक आहे बाभूळगाव तालुक्यातील उमरीचे स्मारक. काळाच्या ओघात अनेक ठिकाणच्या स्मारकांवर स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक स्मारकांच्या इमारती मोडकळीस आल्या. मात्र उमरीचे स्मारक दिवसेन्दिवस अधिकाधिक देखणे होत आहे. यामागे जिल्हा परिषदेची धडपड जेवढी कारणीभूत आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे उमरी गावकऱ्यांमध्ये ठासून भरलेली राष्ट्रीयतेची भावना.मी शहीद स्मारकभारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे, ९ ऑगस्ट क्रांती दिन... स्वातंत्र्यासाठी १९४२ चा अखेरचा लढा. महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला. ‘करेंगे या मरेंगे’च्या गगनभेदी घोषणेने अख्खा देश पेटून उठला. या आंदोलनात लाखो तरुणांनी सहभाग नोंदविला अन् बघता बघता सारा देशच जणू तुरुंग झाला. परंतु ९ ऑगस्टला देशात विविध ठिकाणी जनक्षोभ भडकला. या आंदोलनात अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारविरोधात बंड पुकारले. अनेकांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्याच स्मरणार्थ प्रत्येक जिल्ह्यात शहीद स्मारके उभारण्यात आली. आज क्रांती दिनानिमित्त या स्मारकांच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारे हे वृत्त...

टॅग्स :Templeमंदिर