शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

सांगा, पाणीटंचाईवर काय उपाययोजना केल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:28 IST

शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना हवे उत्तर : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचा आज आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे. म्हणूनच शुक्रवारी सोळाही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाºयांनी पाणीटंचाईवर नेमकी काय पावले उचलली, याचा आढावा घेतला जाणार आहे.गेल्या आर्थिक वर्षात नगरपरिषदांनी पूर्ण केलेल्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. इतर कामांसोबतच पाणीटंचाईचा प्रश्न बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार असल्याने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:च उपस्थित राहिले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. यवतमाळप्रमाणेच बहुतांश नगरपरिषदांमधील पाणीपुरवठ्याची भिस्त शहरालगतच्या धरणांवर आहे. पांढरकवड्याची तहान सायखेडा धरणावर, घाटंजीचा पाणीपुरवठा आता येळाबारा धरणावर भागवायचा का, अशा हालचाली सुरू आहेत. परंतु, नेमके उपाय काय करता येतील, याबाबत बैठकीत खल होणार आहे.शिवाय, नुकतेच आर्थिक वर्ष संपले आहे. गेल्या वर्षात कोणती कामे झाले, त्यावरील निधीचा विनियोग मुख्याधिकाऱ्यांनी कसा केला, याबाबतचाही आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यासाठी २०१३-१४ ते २०१६-१७ या वर्षांत नगरपरिषदांनी ज्या-ज्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेतली होती, त्या कामांची संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख नजर ठेऊन आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या उपाययोजना आणि आगामी काळात होणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत ते माहिती घेणार आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून बैठकीत त्यावर खल होणार आहे. ही बैठक शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.यवतमाळ शहरातील टंचाई उपाययोजनेबाबत उत्सुकतासर्व मुख्याधिकाऱ्यांकडून पाणीटंचाईचा आढावा घेताना यवतमाळच्या प्रश्नावर प्रचंड खल होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक संकट, त्यात नगरपरिषदेतील दोन पक्षांचा संघर्ष यात टंचाईनिवारणाच्या कामांचा आढावा सादर करताना मुख्याधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. शिवाय, ३१ मार्चअखेर मालमत्ता आणि पाणीपट्टीची वसुली किती झाली, हेही सांगावे लागणार आहे. यवतमाळात मालमत्ता करावरून वादंग माजलेले आहे. अन् पाणीच नाही तर पाणीपट्टी वसुली किती झाली असावी, हाही प्रश्न आहे. एकंदरीत शहरातील पाणी प्रश्न गुंतागुंतीचा होत आहे.

टॅग्स :Waterपाणी