शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

सांगा, पाणीटंचाईवर काय उपाययोजना केल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:28 IST

शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना हवे उत्तर : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचा आज आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे. म्हणूनच शुक्रवारी सोळाही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाºयांनी पाणीटंचाईवर नेमकी काय पावले उचलली, याचा आढावा घेतला जाणार आहे.गेल्या आर्थिक वर्षात नगरपरिषदांनी पूर्ण केलेल्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. इतर कामांसोबतच पाणीटंचाईचा प्रश्न बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार असल्याने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:च उपस्थित राहिले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. यवतमाळप्रमाणेच बहुतांश नगरपरिषदांमधील पाणीपुरवठ्याची भिस्त शहरालगतच्या धरणांवर आहे. पांढरकवड्याची तहान सायखेडा धरणावर, घाटंजीचा पाणीपुरवठा आता येळाबारा धरणावर भागवायचा का, अशा हालचाली सुरू आहेत. परंतु, नेमके उपाय काय करता येतील, याबाबत बैठकीत खल होणार आहे.शिवाय, नुकतेच आर्थिक वर्ष संपले आहे. गेल्या वर्षात कोणती कामे झाले, त्यावरील निधीचा विनियोग मुख्याधिकाऱ्यांनी कसा केला, याबाबतचाही आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यासाठी २०१३-१४ ते २०१६-१७ या वर्षांत नगरपरिषदांनी ज्या-ज्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेतली होती, त्या कामांची संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख नजर ठेऊन आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या उपाययोजना आणि आगामी काळात होणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत ते माहिती घेणार आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून बैठकीत त्यावर खल होणार आहे. ही बैठक शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.यवतमाळ शहरातील टंचाई उपाययोजनेबाबत उत्सुकतासर्व मुख्याधिकाऱ्यांकडून पाणीटंचाईचा आढावा घेताना यवतमाळच्या प्रश्नावर प्रचंड खल होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक संकट, त्यात नगरपरिषदेतील दोन पक्षांचा संघर्ष यात टंचाईनिवारणाच्या कामांचा आढावा सादर करताना मुख्याधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. शिवाय, ३१ मार्चअखेर मालमत्ता आणि पाणीपट्टीची वसुली किती झाली, हेही सांगावे लागणार आहे. यवतमाळात मालमत्ता करावरून वादंग माजलेले आहे. अन् पाणीच नाही तर पाणीपट्टी वसुली किती झाली असावी, हाही प्रश्न आहे. एकंदरीत शहरातील पाणी प्रश्न गुंतागुंतीचा होत आहे.

टॅग्स :Waterपाणी