शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

दूरसंचार विभागाचे पोल कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:35 IST

दूरसंचार क्षेत्रा देशपातळीवर पूर्वीपासून कार्यरत असलेल्या बीएसएनएलची मोठी गुंतवणूक आहे. जेव्हा आॅप्टीक फायबर केबलचा शोध नव्हता. त्या काळात लोखंडी पोल व तारांच्या माध्यमातून फोनची जोडणी देण्यात येत होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी टेलिफोन फोन दिसत होते. ग्रामीण नेटवर्क पोहोचविण्यासाठी याचाच वापर केला जात होता.

ठळक मुद्देमालमत्ता इतरांच्या वापरात : शहरासह ग्रामीण भागातील यंत्रणा वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दूरसंचार क्षेत्रा देशपातळीवर पूर्वीपासून कार्यरत असलेल्या बीएसएनएलची मोठी गुंतवणूक आहे. जेव्हा आॅप्टीक फायबर केबलचा शोध नव्हता. त्या काळात लोखंडी पोल व तारांच्या माध्यमातून फोनची जोडणी देण्यात येत होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी टेलिफोन फोन दिसत होते. ग्रामीण नेटवर्क पोहोचविण्यासाठी याचाच वापर केला जात होता. बदल्या तंत्रज्ञानाने ही संपूर्ण यंत्रणा आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलची मालमत्ता सर्वत्र विखुरली आहे. अनेक ठिकाणेच पोल, तार गायब झाल्या आहेत. तर शहरामध्ये टलिफोन पोलचा वापर हा केबलवाले करत आहेत. यातून बीएसएनएलला कोणतेच भाडे मिळत नाही.माहिती तंत्रज्ञामध्ये सातत्याने आमूलाग्र बदल होत आहे. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सुरूवातील लॅन्ड लाईन फोनचा वापर हा आॅपरेटरच्या माध्यमातून करावा लागत होता. याला ट्रंक कॉल देखील संबोधले जात होते. त्यानंतर घरच्या लॅन्ड लाईन फोनवरून थेट कॉल मिळत होता. पूर्वी फोन हा काही ठराविक घरातच दिसत असे, त्यानंतर बीएसएनएलने गावागावात नेटवर्क पोहोचविण्यासाठी आॅप्टीक फायबर केबल टाकणे सुरू केले. या काळात मोबाईल महानगरापूरताच मर्यादित होता. दरम्यान नेटवर्क कव्हरेज वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू होते. सरकारच्या अधिपत्याखालील कंपनीने आपल्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले. मोबाईल येताच टॉवर उभारणी केली. या सर्व बदलत्या तंत्रज्ञानाने टेलिफोन पोल व तारा दुर्लक्षित झाल्या. या पोल व तारा गोळा करण्यासाठी येणारा खर्च हा त्याच्या आजच्या बाजार भावापेक्षा अधिक असल्याचे दूरसंचार विभागातील एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय जुन्या मालमत्तेबाबतचा निर्णय हा दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात घेतला जातो. त्यामुळे यावर अजूनपर्यंत तरी कोणतेच धोरण ठरलेले नसल्याचे सांगण्यात आले. कधीकाळी गल्लीबोळात लागलेले टेलिफोन पोल आता इतरांकडून वापरले जात आहे. वाहिन्यांच्या केबल चालकांनी याचा पुरेपूर उपयोग केला आहे. तर काही ठिकाणचे पोल हे अनेकांनी इतरत्र काढून लावले आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएल