शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी मदतीला तहसीलदारांचा ठेंगा

By admin | Updated: May 14, 2015 02:13 IST

दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीची मदत जिल्ह्यात आली. हा निधी ३० एप्रिलपर्यंत वितरित करण्याचा आदेश तहसीलदारांना देण्यात आला.

यवतमाळ : दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीची मदत जिल्ह्यात आली. हा निधी ३० एप्रिलपर्यंत वितरित करण्याचा आदेश तहसीलदारांना देण्यात आला. मात्र आजही नऊ कोटी रुपये तहसीलदारांच्याच खात्यात पडून आहे. यातील एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. शासनाच्या आदेशाला तहसीलदारांनी ठेंगा दाखविला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील चार हजार ६४६ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. या ठिकाणी आणखी काही वर्ष शेती कसणे अशक्य आहे. अशा भयावह स्थितीवर मात करण्यासाठी शासनाने २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र निधीच दिला नाही. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. अशातच दोन वर्ष निघून गेले. आता कुठे महिनाभरापूर्वी जिल्ह्याकडे खरडीचे नऊ कोटी रुपये आले आहे. पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी ३० एप्रिलची मुदत तहसीलदारांना दिली होती. तहसीलदारांनी ही मुदत स्वीकारलीही होती. प्रत्यक्षात मात्र आजही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा पोहोचलाच नाही. महिनाभरापासून हा पैसा तहसीलदारांच्या खात्यात पडून आहे. शेतकऱ्यांचा पैसा बँकेत पडून असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना ही मदत महत्वाची ठरली आसती. मात्र आता ही मदत केव्हा मिळणार हे मात्र कुणालाच माहित नाही. (शहर वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला तहसीलदारांंना जाब खरडलेल्या शेतजमिनी संदर्भात मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली. बुधवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदारांना मदत का वाटली नाही याचा जाब विचारला. त्यावेळी कृषी विभागाकडून यादी मिळाली नाही, असा मुद्दा मांडत आपले घोंगडे कृषी विभागावर झटकले. तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठलीच माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी चांगलेच संतप्त झाले. येत्या तीन दिवसात यावर तोडगा काढून शेतकऱ्यांच्या मदतीच्या याद्या जाहीर करण्याची सूचना दिली. तसेच माहिती देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला.