शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

अतिवृष्टी मदतीला तहसीलदारांचा ठेंगा

By admin | Updated: May 14, 2015 02:13 IST

दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीची मदत जिल्ह्यात आली. हा निधी ३० एप्रिलपर्यंत वितरित करण्याचा आदेश तहसीलदारांना देण्यात आला.

यवतमाळ : दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीची मदत जिल्ह्यात आली. हा निधी ३० एप्रिलपर्यंत वितरित करण्याचा आदेश तहसीलदारांना देण्यात आला. मात्र आजही नऊ कोटी रुपये तहसीलदारांच्याच खात्यात पडून आहे. यातील एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. शासनाच्या आदेशाला तहसीलदारांनी ठेंगा दाखविला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील चार हजार ६४६ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. या ठिकाणी आणखी काही वर्ष शेती कसणे अशक्य आहे. अशा भयावह स्थितीवर मात करण्यासाठी शासनाने २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र निधीच दिला नाही. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. अशातच दोन वर्ष निघून गेले. आता कुठे महिनाभरापूर्वी जिल्ह्याकडे खरडीचे नऊ कोटी रुपये आले आहे. पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी ३० एप्रिलची मुदत तहसीलदारांना दिली होती. तहसीलदारांनी ही मुदत स्वीकारलीही होती. प्रत्यक्षात मात्र आजही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा पोहोचलाच नाही. महिनाभरापासून हा पैसा तहसीलदारांच्या खात्यात पडून आहे. शेतकऱ्यांचा पैसा बँकेत पडून असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना ही मदत महत्वाची ठरली आसती. मात्र आता ही मदत केव्हा मिळणार हे मात्र कुणालाच माहित नाही. (शहर वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला तहसीलदारांंना जाब खरडलेल्या शेतजमिनी संदर्भात मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली. बुधवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदारांना मदत का वाटली नाही याचा जाब विचारला. त्यावेळी कृषी विभागाकडून यादी मिळाली नाही, असा मुद्दा मांडत आपले घोंगडे कृषी विभागावर झटकले. तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठलीच माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी चांगलेच संतप्त झाले. येत्या तीन दिवसात यावर तोडगा काढून शेतकऱ्यांच्या मदतीच्या याद्या जाहीर करण्याची सूचना दिली. तसेच माहिती देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला.