शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अतिवृष्टी मदतीला तहसीलदारांचा ठेंगा

By admin | Updated: May 14, 2015 02:13 IST

दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीची मदत जिल्ह्यात आली. हा निधी ३० एप्रिलपर्यंत वितरित करण्याचा आदेश तहसीलदारांना देण्यात आला.

यवतमाळ : दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीची मदत जिल्ह्यात आली. हा निधी ३० एप्रिलपर्यंत वितरित करण्याचा आदेश तहसीलदारांना देण्यात आला. मात्र आजही नऊ कोटी रुपये तहसीलदारांच्याच खात्यात पडून आहे. यातील एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. शासनाच्या आदेशाला तहसीलदारांनी ठेंगा दाखविला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील चार हजार ६४६ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. या ठिकाणी आणखी काही वर्ष शेती कसणे अशक्य आहे. अशा भयावह स्थितीवर मात करण्यासाठी शासनाने २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र निधीच दिला नाही. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. अशातच दोन वर्ष निघून गेले. आता कुठे महिनाभरापूर्वी जिल्ह्याकडे खरडीचे नऊ कोटी रुपये आले आहे. पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी ३० एप्रिलची मुदत तहसीलदारांना दिली होती. तहसीलदारांनी ही मुदत स्वीकारलीही होती. प्रत्यक्षात मात्र आजही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा पोहोचलाच नाही. महिनाभरापासून हा पैसा तहसीलदारांच्या खात्यात पडून आहे. शेतकऱ्यांचा पैसा बँकेत पडून असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना ही मदत महत्वाची ठरली आसती. मात्र आता ही मदत केव्हा मिळणार हे मात्र कुणालाच माहित नाही. (शहर वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला तहसीलदारांंना जाब खरडलेल्या शेतजमिनी संदर्भात मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली. बुधवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदारांना मदत का वाटली नाही याचा जाब विचारला. त्यावेळी कृषी विभागाकडून यादी मिळाली नाही, असा मुद्दा मांडत आपले घोंगडे कृषी विभागावर झटकले. तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठलीच माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी चांगलेच संतप्त झाले. येत्या तीन दिवसात यावर तोडगा काढून शेतकऱ्यांच्या मदतीच्या याद्या जाहीर करण्याची सूचना दिली. तसेच माहिती देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला.