शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नागपूर-तुळजापूर चौपदरी महामार्गासाठी १६ हजारांवर सागवान वृक्ष तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:11 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ८० हजार किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील तब्बल १६ हजार सागवान वृक्ष अंतिम परवानगीशिवाय कापली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे अंतिम परवानगी नाही, तरीही यवतमाळ वनविभाग गप्प !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ८० हजार किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील तब्बल १६ हजार सागवान वृक्ष अंतिम परवानगीशिवाय कापली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या वृक्षांची किंमत २० कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून संपूर्ण मार्ग चौपदरी केला जात आहे. मध्यप्रदेशातील राजकीय वरदहस्त असलेल्या एका कंपनीला हा कंत्राट मिळाला आहे. या मार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले गेले. या मार्गाची रुंदी पूर्वी ६० फूट अर्थात १८ मीटर एवढी होती. परंतु ती आता दोन्ही बाजूला ११-११ मीटर वाढवून थेट ४० मीटर एवढी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूला ११ मीटर क्षेत्रातील सागवान वृक्षे या महामार्गात अडसर ठरत होती. ती केवळ पहिल्या टप्प्याची परवानगी घेऊन कापण्यात आली. अंतिम परवानगी नसताना सुमारे २० कोटींची वृक्षे कापण्यात आली. अंतिम परवान्यासाठी किमान १९ अटींची पूर्तता करावी लागते. प्रत्यक्षात वन विभागाच्या रेकॉर्डवर केवळ ४६ लाखांच्या वृक्षाचीच कटाई दाखविली गेली. वृक्ष कटाई व वाहतुकीचे हे कामही दुसऱ्या-तिसऱ्या कंत्राटदाराकडेच वळते झाले.यवतमाळ ते महागाव या सुमारे ८० किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील (३२० ते ४०० किलोमीटर अंतरातील) वृक्षतोडीचे कंत्राट एका व्यक्तीला देण्यात आला आहे. त्यांनी तो ‘गुप्त’पणे तिसºया व्यक्तीकडून अंमलबजावणी करून घेतल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यात चहूबाजूने सागाचे घनदाट जंगल आहे. प्रत्येक किलोमीटरमध्ये किमान १०० परिपक्व सागवान वृक्ष आहेत.

डीएफओ-सीसीएफ मूग गिळूनएवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही वनखात्यातून मात्र कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. वॉचमनपासूनचा अनुभव असलेले आर्णीचे वनपरिक्षेत्र अधिकारी, अद्याप परिविक्षाधीन कार्यकाळही पूर्ण न केलेले सहायक वनसंरक्षक, यवतमाळचे उपवनसंरक्षक व यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक राऊळकर ही सर्वच मंडळी या वृक्षतोडीबाबत गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कंत्राटदाराच्या राजकीय वजनामुळे तर वन खात्याचे हे अधिकारी या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करीत नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग