शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आपसी बदल्याचे भिजत घोंगडे

By admin | Updated: October 25, 2014 22:47 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सातत्याने ग्रामविकास विभागाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असून शिक्षकांच्या आपसी बदल्याचे भिजत घोंगडे दोन वर्षापासून कायम आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सातत्याने ग्रामविकास विभागाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असून शिक्षकांच्या आपसी बदल्याचे भिजत घोंगडे दोन वर्षापासून कायम आहे. ऐन दिवाळीच्या सुट्या संपताना शिक्षण विभागाकडून बदलीच्या कार्यवाहीचा देखावा केला जातो. मात्र शाळा सुरू झाली की हा विषय मागे पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील १४० शिक्षकांची बदलीप्रकरणे रखडली आहे. जिल्हा परिषदेत २०१३ पासून शिक्षकांच्या आपसी बदलीची प्रक्रियाच राबविण्यात आली नाही. २०१३ च्या दिवाळीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाल्याची सबब पुढे करण्यात आली होती. विशेष म्हणजे याच काळात राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या आपसी बदल्यांची प्रक्रिया पुर्ण केली. यवतमाळ जिल्हा परिषद याला अपवाद ठरली. आपसी बदली प्रक्रियेत आर्थिक उलाढाल होत नसल्याने यासाठी प्रशासना याबाबत फारसे गंभीर राहत नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात २०११ आणि २०१२ या वर्षात प्रशासकीय बदलीने वेगवेगळया पंचायत समितीत कार्यरत असलेले १४० शिक्षक आपसी बदलीसाठी पात्र आहेत. मात्र अशा पात्र शिक्षकांची यादी प्रसिध्द करण्याची तसदी सुध्दा शिक्षण विभागाने घेतली नाही. २०१३ मध्ये शिक्षक आपल्या हक्कापासून वंचित राहील्याने २२ आॅगस्ट २०१४ मध्ये ग्रामविकास विभागाने सुधारित आदेश काढून दिवाळीच्या सुट्टी मध्ये शिक्षकांच्या आपसी बदलीची प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले. आपसी बदलीचा मुद्दा घेऊनच प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही शिक्षणविभागाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. दिवाळी सुटी ही १ आॅक्टोबर पर्यंतच आहे. त्यापूर्वीच आपसी बदलीची प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश सीईओ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहे. मात्र अद्यापही शिक्षण विभागाकडून बदली पात्र शिक्षकांची यादी सुध्दा लावण्यात आली नाही. अतिशय संथपणे कारभार सुरू असल्याने दिवाळच्या सुट्या संपेपर्यंत प्रक्रिया पुर्ण केली जाते की, नाही अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग हा सातत्यानेच चर्चेत राहीला आहे. येथील वादग्रस्त कारभाराची परंपार अजुनही कायम असल्याचे दिसून येते. वरिष्ठांच्या आदेशानंतरी येथील यंत्रणा फारसी गांभीर्याने काम करत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)