लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोकळा वेळ ही संपत्ती आहे. त्याचा सदुपयोग केला तर जीवन समृद्ध होत जाते. संकटांची मालिका घेऊन आलेला कोरोना अनेकांसाठी असा भरपूर मोकळा वेळ आला आहे. राज्यातील शिक्षकांनी या वेळेचा सर्जनशील वापर करीत थेट संपादनाचे शिवधनुष्य उचलले आहे. कोरोना संकटाने शाळांना शिकविलेले अनुभव लिहून काढत आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मासिकांचा उपक्रम सुरू केला आहे.आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे कोरोनाने मोठ्या अडचणी उभ्या केल्या. गोरगरिबांच्या पोरांना शिकविणाऱ्या या शाळांमधील शिक्षकांनी अध्यापनाच्या धडाकेबाज पद्धती शोधून कोरोनातही अध्यापन सुरू ठेवले. त्यांच्या धाडसाच्या कहाण्या शिक्षकांनीच लिहून, संपादित केल्या. त्यातूनच ‘आश्रमशाळा अस्मिता’ आणि ‘शिक्षक मित्र’ ही दोन मासिके यवतमाळ जिल्ह्यात जन्मास आली आणि महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या हाती पडली. विशेष म्हणजे, संपूर्ण मोफत आणि स्वत:च्या अनुभवातून, शब्दातून सजलेली ही मासिके शिक्षकांसोबतच पालक, विद्यार्थी आणि अधिकारी यांच्यातील वैचारिक सेतू ठरत आहेत.आश्रमशाळांची ‘अस्मिता’आश्रमशाळा शिक्षकांनी एकत्र येत ‘आश्रमशाळा अस्मिता’ मासिकाची निर्मिती केली. गांधी जयंतीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते व आदिवासी विकास विभागाचे माजी सहआयुक्त दशरथ पानमंद यांच्या उपस्थितीत आॅनलाइन पद्धतीने त्याचे लोकार्पण झाले. पहिला अंक ‘अनलॉक लर्निंग’मधील धडपडीवर आधारीत असल्याचे संपादक विशाखा केवटे, सहसंपादक साहेबराव मोहोड यांनी सांगितले.जिल्हा परिषदेचे ‘शिक्षक मित्र’जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी एकत्र येत ‘शिक्षक मित्र’ हे मोफत त्रैमासिक सुरू केले. नवे शैक्षणिक धोरण समजावून सांगणारे लेख यात शिक्षकांनीच दिले. डॉ. सतपाल सोवळे, किशोर तळोकार, विजय वाघ, अरविंद झलके, डॉ भारती ताठे, मनोज भुजबले, महादेव निमकर, हितेश राठोड, मंदार पुंडशास्त्री, संदीप कोल्हे, निलेश सपाटे संपादकीय काम करीत आहेत. उपक्रमशील शिक्षकांना वाव मिळावा, याकरिता ही धडपड असल्याचे अवधुत वानखडे, गजू पोयाम यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटात शिक्षक बनलेय संपादक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST
आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे कोरोनाने मोठ्या अडचणी उभ्या केल्या. गोरगरिबांच्या पोरांना शिकविणाऱ्या या शाळांमधील शिक्षकांनी अध्यापनाच्या धडाकेबाज पद्धती शोधून कोरोनातही अध्यापन सुरू ठेवले. त्यांच्या धाडसाच्या कहाण्या शिक्षकांनीच लिहून, संपादित केल्या. त्यातूनच ‘आश्रमशाळा अस्मिता’ आणि ‘शिक्षक मित्र’ ही दोन मासिके यवतमाळ जिल्ह्यात जन्मास आली आणि महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या हाती पडली.
कोरोनाच्या संकटात शिक्षक बनलेय संपादक !
ठळक मुद्देजिल्ह्यात सुरुवात, राज्यावर स्वारी : ‘अनलॉक लर्निंग’, शैक्षणिक धोरणावर अनुभवी लेखन