शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

जिल्ह्यात शिक्षकांचा अनुशेष

By admin | Updated: June 3, 2017 00:49 IST

जिल्ह्यात शिक्षकांच्या ८१३ पदांचा अद्याप अनुशेष असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी सांगितले.

८१३ पदे रिक्त : सहा हजार ४८0 पदे मंजूर, ‘पेसा’त ८५0 शिक्षक लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात शिक्षकांच्या ८१३ पदांचा अद्याप अनुशेष असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी सांगितले. संचमान्यता चुकीची असल्याच्या आरोपानंतर त्यांनी शिक्षण विभागाची स्थिती विषद केली. स्थायी समितीच्या सभेत बुधवारी काँग्रेसचे राम देवसरकर यांनी संचमान्यता चुकीची असल्याचा आरोप केला. पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात अद्याप शिक्षकांची प्रत्येकी १५० पदे रिक्त असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी रोस्टरनुसार जिल्ह्यात शिक्षकांची सहा हजार ४८० पदे मंजूर असून प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्रात सहा हजार ४४३, तर ‘पेसा’अंतर्गत येणाऱ्या शाळांवर ८५० शिक्षक कार्यरत असल्याचे सांगितले. तरीही जिल्ह्यात ८१३ शिक्षकांचा अनुशेष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जया पोटे यांनी विषय शिक्षकांची पदे चुकीची दर्शविण्यात आल्याचा आरोप केला. कळंब तालुक्यातील गुजरी येथे जादा पटसंख्या असूनही विषय शिक्षकाचे पद दर्शविण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. चुकीच्या संचमान्यतेमुळे हा घोळ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र वर्गखोल्या आणि पटसंख्येच्या निकषानुसारच विषय शिक्षकाचे पद दर्शविण्यात आल्याचा दावा शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर यांनी केला. तथापि गुजरी येथे जुलैमध्ये प्रक्रिया राबवून पद भरले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्याध्यापकांनी केली चूक मुख्याध्यापकांनी भरलेल्या माहितीवर आधारित राहून संचमान्यता केली जाते. अनेक मुख्याध्यापकांनी माहिती भरताना चूक केल्याने संचमान्यता चुकीची झाल्याचे डॉ. पाटेकर यांनी सांगितले. सदस्यांनी अशा मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली, तर काही पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना तुम्ही येथे बसून काय करता, असा प्रश्न विचारून भंडावून सोडले. पाटणबोरी येथे मुख्याध्यापकांचे क्वॉर्टर असून त्याची मालकी कुणाकडेच नसल्याचे यावेळी दिसून आले. विशेष म्हणजे तेथे क्वार्टर आहे, ही बाब कुणालाच माहिती नव्हती. तथापि पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार यांनी तेथे मुख्याध्यापकांचे क्वार्टर असल्याचे कबूल केले. अध्यक्ष माधुरी आडे यांनी यावर योग्य कारवाईचे आदेश दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सर्व मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्याचेही निर्देश दिले.