शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘चाय पे चर्चा’ नव्हे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:31 IST

तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने ......

ठळक मुद्देदाभडीतील वास्तव : मोदी यांच्यासाठी चहा बनविणाराच हतबल

ऑनलाईन लोकमतआर्णी : तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने या शेतकऱ्यावरच आता शेताच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.गेल्या २0१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून दाभडी हे गाव सतत चर्चेत आहे. निवडणुकीनंतर तर गाव आणखीच प्रकाशझोतात आले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच गावाला त्यावेळी भेट दिली होती. त्यांनी गावातील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी, नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला होता. भाजपाला सत्ता देण्याचे आवाहन केले होते. नंतर देशात परिवर्तन होऊन मोदी थेट पंतप्रधान झाल्याने साहजिकच गावकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र गावकऱ्यांच्या साध्या समस्याही सुटणे आता कठीण झाल्याचे दिसत आहे.दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी अमोल रामभाऊ दिवाने यांच्या घरी बनविण्यात आला होता. त्यामुळे अमोल दिवाने चर्चेत आले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आपली समस्या सुटेल असे वाटले होते. मात्र झाले उलटेच. गेल्या काही वर्षांपासून अमोल आपल्या शेतात जायला रस्ता नसल्याने त्रासून गेले आहे. रस्त्यासाठी त्यांनी वारंवार लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. ‘आपले सरकार पोर्टल’वर तक्रार देऊनही लाभ झाला नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार राजू तोडसाम यांना समस्या सांगूनही उप्योग झाला नाही. यामुळे हतबल झालेल्या अमोल दिवाने यांनी सोमवारपासून आर्णी तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.शेती राहिली पडिकशेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अमोल दिवाने यांची शेती पडीत राहिली आहे. त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शेती पडीत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. ‘मोदी साहेब’ प्रधानमंत्री झाले, भाजपाचेच हंसराज अहीर खासदार अन् केंद्रात राज्यमंत्री बनले, तर राजू तोडसाम आमदार झाले. तरीही न्याय मिळत नसल्याबद्दल दिवाने यांनी संताप व्यक्त केला आहे. अखेर न्यायासाठीच आमरण उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे त्यांनी सांगितले.