शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

‘चाय पे चर्चा’ नव्हे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:31 IST

तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने ......

ठळक मुद्देदाभडीतील वास्तव : मोदी यांच्यासाठी चहा बनविणाराच हतबल

ऑनलाईन लोकमतआर्णी : तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने या शेतकऱ्यावरच आता शेताच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.गेल्या २0१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून दाभडी हे गाव सतत चर्चेत आहे. निवडणुकीनंतर तर गाव आणखीच प्रकाशझोतात आले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच गावाला त्यावेळी भेट दिली होती. त्यांनी गावातील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी, नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला होता. भाजपाला सत्ता देण्याचे आवाहन केले होते. नंतर देशात परिवर्तन होऊन मोदी थेट पंतप्रधान झाल्याने साहजिकच गावकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र गावकऱ्यांच्या साध्या समस्याही सुटणे आता कठीण झाल्याचे दिसत आहे.दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी अमोल रामभाऊ दिवाने यांच्या घरी बनविण्यात आला होता. त्यामुळे अमोल दिवाने चर्चेत आले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आपली समस्या सुटेल असे वाटले होते. मात्र झाले उलटेच. गेल्या काही वर्षांपासून अमोल आपल्या शेतात जायला रस्ता नसल्याने त्रासून गेले आहे. रस्त्यासाठी त्यांनी वारंवार लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. ‘आपले सरकार पोर्टल’वर तक्रार देऊनही लाभ झाला नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार राजू तोडसाम यांना समस्या सांगूनही उप्योग झाला नाही. यामुळे हतबल झालेल्या अमोल दिवाने यांनी सोमवारपासून आर्णी तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.शेती राहिली पडिकशेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अमोल दिवाने यांची शेती पडीत राहिली आहे. त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शेती पडीत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. ‘मोदी साहेब’ प्रधानमंत्री झाले, भाजपाचेच हंसराज अहीर खासदार अन् केंद्रात राज्यमंत्री बनले, तर राजू तोडसाम आमदार झाले. तरीही न्याय मिळत नसल्याबद्दल दिवाने यांनी संताप व्यक्त केला आहे. अखेर न्यायासाठीच आमरण उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे त्यांनी सांगितले.