रावसाहेब दानवे : भाजपाच्या महासंपर्क अभियानाला प्रारंभयवतमाळ : पुढील विधानसभेत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेत येईल, हेच उदिष्ट प्रत्येक कार्यकर्त्याने डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केले. ते बुधवारी येथील संदीप मंगलम सभागृहात आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर व्यासपिठावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष उद्धवराव येरमे, विजय कोटेचा, माजी आमदार उत्तमराव इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा कोठेकर, बाबासाहेब गाडे पाटील, मनोज इंगोले, प्रा. प्रवीण प्रजापती, राजू पडगिलवार आदींची उपस्थिती होती. रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यात एक कोटीहून अधिक भाजपा सदस्यांची नोंदणी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख ७० हजार नवीन सदस्य नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात महासंपर्क अभियान राबवायचे आहे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेत सहभागी होऊन निकाल देणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा भविष्यात नक्कीच पार्टी विचार करणार असून त्यांना योग्य संधी मिळणार आहे. परंतु काही वर्षे वाट पाहावी लागेल आणि आपल्या कामाचा परिचय द्यावा लागेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील पाचही आमदारांची अनुपस्थिती आजच्या भाजपा महासंपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वच पाचही आमदारांची अनुपस्थिती होती. याबाबत स्पष्टीकरण देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, विधिमंडळ कामकाजाची गडबड बघता आमदारांनी मुंबईलाच राहणे आवश्यक होते, तसा मला काल मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि त्यानंतर मी सर्व आमदारांना फोन करून तुम्ही यवतमाळच्या कार्यक्रमाला यायची गरज नसल्याचे सांगितले.
आगामी विधानसभेत स्वबळाचे उद्दिष्ट ठेवा
By admin | Updated: July 16, 2015 02:27 IST