शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

टँकर वस्तीतून जातो, पण थांबत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:36 IST

शहरात पाणी कुठेच नाही. नगरपरिषदेने टँकर लावून तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र व्यवस्थेतील कीडे हे पाणीही मधल्या मध्ये पळवून नेत आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव परिसर पाणी मागणाऱ्या मजुरांना दमदाटी, आम्ही माणसे नव्हे काय ?

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात पाणी कुठेच नाही. नगरपरिषदेने टँकर लावून तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र व्यवस्थेतील कीडे हे पाणीही मधल्या मध्ये पळवून नेत आहे. पिंपळगाव परिसरातील काही वसाहतींमधून रोज टँकर जातो, पण थांबत नाही. लोकांनी टँकर थांबवून पाणी मागितले तर त्यांना पोलिसांकरवी दमदाटी करून हाकलून लावले जात आहे. या स्थितीने चिडलेल्या नागरिकांनी ‘आम्ही माणसे नव्हे का?’ असा संतप्त सवाल थेट जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केला आहे. टँकर मिळाला नाही तर अख्खी वसाहतच जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्कामाला येईल, असे रीतसर पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.यवतमाळ नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या पिंपळगावमधील विसावा कॉलनी, झोपडपट्टी वसाहतीसह प्रभाग चारमधील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. या भागात पाण्याची तजवीज करण्यासाठी दोन टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी अर्धा ड्रम पाणी आले. यामुळे नागरिकांनी संताप नोंदविला. तेव्हापासून या भागातील काही लाईनला टँकरचे पाणी आलेच नाही. आता या भागातून टँकर जाताना दिसतात, मात्र ते काही लाईनमध्ये थांबत नाही. सगळे लोक त्याकडे भिरभिर नजरेने पाहतात. २२ दिवसांपासून नळ आला नाही. यामुळे घरातला प्रत्येक सदस्य रोज पाण्यासाठी हापशीवर जातो, असे लता भोंगे म्हणाल्या.रात्री २ वाजतापर्यंत हापशीवर वर्दळ असते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री पाणी भरावे लागते, असे शालिनी शेंडे म्हणाल्या. रात्री हापशीवर लाईटचीही व्यवस्था नाही. थंडाव्यात सापही असतात. घरातल्या चिल्यापिल्यांसह पाण्यासाठी धावपळ करावी लागते. बॅटरी घेऊन पाणी भरावे लागते, असे नलू पडोळे, अर्चना मडावी, वेणू बावनकर म्हणाल्या.आम्ही महागडे पाणी विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच नगरपरिषदेने पाण्याची मोफत व्यवस्था केली. पण आम्हाला त्या टँकरचे पाणी भेटले नाही. आम्ही रोज हापशीवरच पाणी भरतो. नगरसेविकेकडे वारंवार पाणी मागितले. आम्हाला पाणी भेटले नाही. पण पोलीस बोलावून हाकलून लावले. आम्हाला पाणी भेटणार नाही का? आम्ही रोजमजुरी करतो म्हणून आमचा पाण्याचा हक्क काढून घेतला का? आम्ही पाण्यासाठी कुठे जायचे, असे प्रश्न शुभम मामीडवार, अमोल चोले, राजेश ढेंगे, आकाश मेश्राम, प्रशांत इंगोले यांनी उपस्थित केले. रोजमजुरीत मिळवलेला सारा पैसा पाण्यासाठी खर्च करायचा का? मग खायचे काय? आम्ही अ‍ॅक्वाचे पाणी लावू शकत नाही. एकच हापशी आमच्या वाट्याला आहे. या भागातले लोक दररोज टँकरची वाट पाहतात. पण टँकर काही केल्या थांबत नाही. झोपडपट्टीत तर हा टँकर फिरकलाच नाही, असे त्यांनी सांगितले.जिल्हा कचेरीत ठोकणार मुक्कामपाणीच नसल्याने आम्ही वैतागलो आहे. आता आमची क्षमता संपली आहे. ९ एप्रिलपर्यंत पाण्याचे टँकर सुरू झाले नाही, तर आम्ही लोक जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकणार आहे. तसे रितसर निवेदन जिल्हाधिकाºयांना दिल्याचे सचिन कदम, नितीन महल्ले आणि अरविंद मडावी यांनी सांगितले.नगरसेविकेने भरला दमया भागातील नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेविकेला दूरध्वनी केला. टँकर कधी पाठविता, असे विचारले. मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. या भागातला टँकर अजिबात रोखायचा नाही, असा दम भरला. त्याचे मोबाईल रेकॉर्डिंग नागरिकांकडे आहे. या ध्वनीफितीसह जिल्हा प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे, संतप्त नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी