शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टँकर वस्तीतून जातो, पण थांबत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:36 IST

शहरात पाणी कुठेच नाही. नगरपरिषदेने टँकर लावून तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र व्यवस्थेतील कीडे हे पाणीही मधल्या मध्ये पळवून नेत आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव परिसर पाणी मागणाऱ्या मजुरांना दमदाटी, आम्ही माणसे नव्हे काय ?

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात पाणी कुठेच नाही. नगरपरिषदेने टँकर लावून तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र व्यवस्थेतील कीडे हे पाणीही मधल्या मध्ये पळवून नेत आहे. पिंपळगाव परिसरातील काही वसाहतींमधून रोज टँकर जातो, पण थांबत नाही. लोकांनी टँकर थांबवून पाणी मागितले तर त्यांना पोलिसांकरवी दमदाटी करून हाकलून लावले जात आहे. या स्थितीने चिडलेल्या नागरिकांनी ‘आम्ही माणसे नव्हे का?’ असा संतप्त सवाल थेट जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केला आहे. टँकर मिळाला नाही तर अख्खी वसाहतच जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्कामाला येईल, असे रीतसर पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.यवतमाळ नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या पिंपळगावमधील विसावा कॉलनी, झोपडपट्टी वसाहतीसह प्रभाग चारमधील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. या भागात पाण्याची तजवीज करण्यासाठी दोन टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी अर्धा ड्रम पाणी आले. यामुळे नागरिकांनी संताप नोंदविला. तेव्हापासून या भागातील काही लाईनला टँकरचे पाणी आलेच नाही. आता या भागातून टँकर जाताना दिसतात, मात्र ते काही लाईनमध्ये थांबत नाही. सगळे लोक त्याकडे भिरभिर नजरेने पाहतात. २२ दिवसांपासून नळ आला नाही. यामुळे घरातला प्रत्येक सदस्य रोज पाण्यासाठी हापशीवर जातो, असे लता भोंगे म्हणाल्या.रात्री २ वाजतापर्यंत हापशीवर वर्दळ असते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री पाणी भरावे लागते, असे शालिनी शेंडे म्हणाल्या. रात्री हापशीवर लाईटचीही व्यवस्था नाही. थंडाव्यात सापही असतात. घरातल्या चिल्यापिल्यांसह पाण्यासाठी धावपळ करावी लागते. बॅटरी घेऊन पाणी भरावे लागते, असे नलू पडोळे, अर्चना मडावी, वेणू बावनकर म्हणाल्या.आम्ही महागडे पाणी विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच नगरपरिषदेने पाण्याची मोफत व्यवस्था केली. पण आम्हाला त्या टँकरचे पाणी भेटले नाही. आम्ही रोज हापशीवरच पाणी भरतो. नगरसेविकेकडे वारंवार पाणी मागितले. आम्हाला पाणी भेटले नाही. पण पोलीस बोलावून हाकलून लावले. आम्हाला पाणी भेटणार नाही का? आम्ही रोजमजुरी करतो म्हणून आमचा पाण्याचा हक्क काढून घेतला का? आम्ही पाण्यासाठी कुठे जायचे, असे प्रश्न शुभम मामीडवार, अमोल चोले, राजेश ढेंगे, आकाश मेश्राम, प्रशांत इंगोले यांनी उपस्थित केले. रोजमजुरीत मिळवलेला सारा पैसा पाण्यासाठी खर्च करायचा का? मग खायचे काय? आम्ही अ‍ॅक्वाचे पाणी लावू शकत नाही. एकच हापशी आमच्या वाट्याला आहे. या भागातले लोक दररोज टँकरची वाट पाहतात. पण टँकर काही केल्या थांबत नाही. झोपडपट्टीत तर हा टँकर फिरकलाच नाही, असे त्यांनी सांगितले.जिल्हा कचेरीत ठोकणार मुक्कामपाणीच नसल्याने आम्ही वैतागलो आहे. आता आमची क्षमता संपली आहे. ९ एप्रिलपर्यंत पाण्याचे टँकर सुरू झाले नाही, तर आम्ही लोक जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकणार आहे. तसे रितसर निवेदन जिल्हाधिकाºयांना दिल्याचे सचिन कदम, नितीन महल्ले आणि अरविंद मडावी यांनी सांगितले.नगरसेविकेने भरला दमया भागातील नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेविकेला दूरध्वनी केला. टँकर कधी पाठविता, असे विचारले. मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. या भागातला टँकर अजिबात रोखायचा नाही, असा दम भरला. त्याचे मोबाईल रेकॉर्डिंग नागरिकांकडे आहे. या ध्वनीफितीसह जिल्हा प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे, संतप्त नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी