शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बळीराजा अभियानात तलाठी रणनवरे यांचे योगदान

By admin | Updated: March 5, 2016 02:42 IST

आपण आणि आपले कुटुंब एवढ्याच मर्यादेत बहुतांश शासकीय कर्मचारी विचार करतात.

कर्मचाऱ्याची समाजसेवा : विद्यार्थ्यांचे प्रबोधनआर्णी : आपण आणि आपले कुटुंब एवढ्याच मर्यादेत बहुतांश शासकीय कर्मचारी विचार करतात. परंतु तलाठी असलेले श्याम रणनवरे महाराज हे नोकरीसोबतच संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देतात. बळीराजा चेतना अभियानातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांसाठी ते प्रभावी प्रबोधन करीत आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाद्वारे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रणनवरे महाराजांनी आर्णी, महागाव, दारव्हा, घाटंजी तालुक्यातील शाळा-महाविद्यालय, वस्ती, वाड्यांवर प्रभावीपणे प्रबोधन केले आहे. मागील महिन्यात ते आपल्या नोकरीतील कर्तव्याला कोणतीही बाधा येऊ न देता गावागावांत पोहोचले. ‘स्वप्नाामधील गावा स्वप्नामधुनी जावे’ या शीर्षकांतर्गत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. जगाच्या पोशिंद्याला जगविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. अंधश्रद्धा, व्यसने, जुन्या रुढी, परंपरा आपल्या विकासाला कशा बाधक ठरतात, हे पटवून देत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे विद्यार्थ्यांपुढे दाखले देतात. परिसरातील शेतकरी आत्महत्या का करीत आहेत, त्या रोखण्यासाठी शासन काय करीत आहे आणि ग्रामस्थांनी काय करायला पाहिजे या संदर्भातील त्यांचे विवेचन विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा परिणाम करीत आहे. यापूर्वी त्यांनी दाभडी, आसरा, देऊरवाडा, लिंगी सायखेडा या गावात हागणदारीमुक्तीची चळवळ उभी केली. आता अशाच गावांची बळीराजा चेतना अभियानासाठी त्यांनी निवड केली आहे. दारव्हा तालुक्यातील चांदणी येथे सभापती सुभाष ठोकळ, लाखखिंड येथे माजी सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत रणनवरे यांनी प्रबोधन केले. दारव्हा तालुक्यातील नऊ गावात त्यांच्या व्याख्यानाच्यावेळी गटविकास अधिकारी गुहे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे उपस्थित होते. घाटंजी तालुक्यातील आमडी येथे त्यांचे व्याख्यान झाले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे उपस्थित होते. राळेगाव तहसीलदार गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात जळका येथे त्यांनी मार्गदर्शन केले. आर्णी, महागाव तालुक्यातही त्यांनी जनजागृती केली. पाणी अडवा-पाणी जिरवा, विहीर पुनर्भरण, नाल्याचे सरळीकरण, रुंदीकरण आदी कामांना प्रोत्साहन देण्याचे त्यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)