शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

वीज हानी टाळण्यासाठी दक्षता घ्या

By admin | Updated: May 31, 2014 00:13 IST

पावसाळ्यात दरवर्षी मराठवाड्यासह विदर्भात विजेचा कडकडाट, गारपीट व वादळी वार्‍यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित्व व वित्त हानी होते. ही हानी टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाणयवतमाळ : पावसाळ्यात दरवर्षी मराठवाड्यासह विदर्भात विजेचा कडकडाट, गारपीट व वादळी वार्‍यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित्व व वित्त हानी होते. ही हानी टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी स्वत: सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे. आकाशात वीज चमकल्यानंतर १0 सेकंदांनी मेघ गर्जनांचा आवाज आल्यास तिथल्या अंदाजे तीन किलोमीटर परिसरात वीज पडण्याची शक्यता असते. मजबूत असलेले पक्के घर हे यापासून वाचण्याचे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. पाण्यात असाल किंवा तलावात काम करीत असाल, ओल्या शेतात रोप लावण्याचे व अन्य काम करणार्‍या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छीमारी करणार्‍यांनी तत्काळ पाण्यातून बाहेर पडावे, शेतात काम करीत असल्यास सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे आहे तिथेच राहावे. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोनही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवून बसा, परंतु डोके जमिनीवर ठेवू नका. धातूपासून बनविलेल्या वस्तू जसे कृषियंत्र आदींपासून दूर राहावे. गाव, शेत, आवार, बागबगिचा आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपन घालू नका. कारण ते विजेला सहजतेने आकर्षित करते. छोट्या झाडाखाली उभे राहू नका. उंच जागेवर झाडांवर चढू नका. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. वृक्ष, दलदलीच्या ठिकाणी तथा पाण्याचे स्रोत यापासून शक्यतो दूर राहावे, मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी राहावे, एकाचवेळी एकाच ठिकाणी जास्त व्यक्तींनी राहू नये. दोन व्यक्तींमधील अंतर किमान १५ फूट असेल असे राहावे. धातूची कांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करू नये. भ्रमणध्वनी, टेलिफोन यांना स्पर्श करू नये. वीज वाहक वस्तूंपासून दूर राहावे. रेडियम, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप, पाण्याचे नळ, फ्रिज, विद्युत उपकरणे बंद ठेवावे, शक्यतो घरातच राहावे. अशावेळी प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नये. दोनचाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे. अशावेळी वाहनातूनसुद्धा प्रवास करणे धोक्याचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. वाहनात प्रवास करत असाल तर वाहनातच राहावे, वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नये. उंच वृक्षाच्या खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे. म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. आपले घर, शेती आदींच्या आसपास कमी उंचीची चांगल्या प्रतीची फळझाडे लावावीत. कपडे वाळविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचा वापर करावा. शक्य असत्यास गाव किंवा वस्तीपासून थोड्या अंतरावर उंच ठिकाणी पाण्याची टाकी, वीज अटकाव यंत्रणा बसवावी. वीज पडल्यास मुख्यत: मानवी हृदय व श्‍वसन प्रक्रियेत अडथळा येतो. विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाजवळील भागाच्या परिसरात हाताने मालिश करावी व तोंडाने श्‍वसन प्रक्रियेत मदत करावी आदी प्रकारची काळजी घेतल्यास व्यक्ती पावसाळ्यात पडणार्‍या विजेपासून शेताचे व इतरांचेही रक्षण करू शकतो. तेव्हा प्रत्येकाने सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)