शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

स्पर्धा परीक्षा द्यायची, तर परवानगी घ्या!

By admin | Updated: September 28, 2015 02:42 IST

नोकरी करतानाच आणखी चांगले पद प्राप्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा उत्तम मार्ग आहे. अनेक शिक्षक यात अग्रेसर आहेत.

शिक्षकांना तंबी : शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्रयवतमाळ : नोकरी करतानाच आणखी चांगले पद प्राप्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा उत्तम मार्ग आहे. अनेक शिक्षक यात अग्रेसर आहेत. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय शिक्षकांना आता स्पर्धा परीक्षा देता येणार नाही. तसे केल्यास त्यांना कार्यमुक्त करता येणार नाही, अशी तंबी दिली आहे.शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या फारशा संधी नाहीत. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदांपर्यंतच ते पोहोचू शकतात. अशावेळी अनेक महत्त्वाकांक्षी शिक्षक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदांसाठी प्रयत्न करतात. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये बसणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. अनेक शिक्षक त्यात यशस्वी होऊन शिक्षण विभागाकडे कार्यमुक्त करण्याचे प्रस्ताव पाठवितात. मात्र, त्यावेळी शिक्षकांना कार्यमुक्त करताना शाळांची गोची होते. नवे शिक्षक नियुक्त करण्यापर्यंत शाळा वाऱ्यावर असते. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाने नियम कडक केले आहे. आतापर्यंत शिक्षक पंचायत समिती स्तरावर परवानगी घेऊन स्पर्धा परीक्षेला बसायचे. मात्र, आता त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांचीच पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. पूर्वपरवानगी न घेता एखादा शिक्षक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याने कार्यमुक्तीचा प्रस्ताव पाठविला, तर त्याला तातडीने कार्यमुक्त करता येणार नाही, अशी सूचना दिली आहे. परवानगी न घेता स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास संबंधित शिक्षकाला सहज कार्यमुक्त करण्यात येणार नाही. त्याचा राजीनामा मंजूर झाला तरी, एक महिन्याचे आगाऊ वेतन कापल्यानंतरच कार्यमुक्त करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)