शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नेर तालुक्यात पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:17 IST

तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न तापला आहे. अशातच पंचायत समितीने कृती आराखडा नाममात्र बनविल्याने पाणी समस्या अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

ठळक मुद्दे३८ गावांना पाणीटंचाईच्या झळा : मंजूर कृतीआराखडा नाममात्र असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न तापला आहे. अशातच पंचायत समितीने कृती आराखडा नाममात्र बनविल्याने पाणी समस्या अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. ३८ गावातील नागरिक आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे.मंजूर आराखड्यात उपाययोजनांचे टप्पेच अधिक पाडण्यात आलेले आहेत. विहीर अधिग्रहणात परजना, शहापूर, चिचगाव पिंपरी (ईजारा), पेंढारा याच गावांचा समावेश करण्यात आला. प्रत्यक्षात आंजती, मांगलादेवी, चिकणी डोमगा, पिंपळगाव काळे याशिवाय इतर गावात विहीर अधिग्रहणाची गरज आहे.टँकरने पाणीपुरवठ्यासाठी चिचगाव, पिंप्री इजारा, पेंढारा या गावांचा समावेश आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी यासह इतर २० गावे तहानलेली आहेत. तात्पुरती पुरक नळयोजनेत बाणगाव, बोंडगव्हान, मांगलादेवी, रत्नापूर, सिंदखेड, परजना गावांचा समावेश आहे. मुळात परजना येथे विहीर आहे. मात्र पाईपलाईन नसल्यावर तात्पुरती कोणती योजना प्रशासन करणार हा प्रश्न आहे. नळयोजना आहे, पण पाणी नाही अशी या गावाची अवस्था आहे.दरवर्षी नळयोजना विशेष दुरुस्तीच्या नावाने कृतीआराखडा तयार केला जातो. मात्र कायस्वरूपी दुरुस्ती कधी झाली नाही. हा निधी जातो कुठे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. धनज, पिंपळगाव (डुब्बा), सोनखास, उत्तरवाढोणा, वटफळी या गावांचा समावेश विशेष दुरुस्तीमध्ये आहे. अनेकदा आराखडे तयार झाले, प्रत्यक्षात दुरुस्ती झालेली नाही.खासगी विहीर अधिग्रहणासाठी पिंपळगाव काळे, बोरगाव, चिकणी डोमगा, चिखली कान्होबा, दहीफळ, धनज, दोनद खुर्द, रामगाव, जवळगाव, सारंगपूर, कोव्हळा, बोदगव्हान, खरडगाव, मालखेड (बु), मालखेड (खुर्द), मंगरूळ, सांवगा, शेंद्री (खुर्द), शिरजगाव, उत्तरवाढोणा, वाई, पारस, वटफळी आदी गावांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आला. या गावात कायमस्वरूपी योजनांची गरज आहे. परंतु याकडे गांर्भियाने कुणीही लक्ष देताना दिसत नाही.भीषणता कमी दाखविण्याचा खटाटोपनेर तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न भीषण झाला आहे. प्रशासनाकडून मात्र टप्प्या टप्प्याने उपायांची आखणी कृती आराखड्यात करण्यात आली आहे. भीषणता लपविण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जाते. एनवेळी केल्या जाणाºया उपाययोजना लोकांसाठी त्रासाच्या ठरणाºया आहेत. प्रत्यक्ष पाणीटंचाई असलेली गावेच कृती आराखड्यात नसल्याने ही शक्यता अधिक आहे.