शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

नेर तालुक्यात पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:17 IST

तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न तापला आहे. अशातच पंचायत समितीने कृती आराखडा नाममात्र बनविल्याने पाणी समस्या अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

ठळक मुद्दे३८ गावांना पाणीटंचाईच्या झळा : मंजूर कृतीआराखडा नाममात्र असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न तापला आहे. अशातच पंचायत समितीने कृती आराखडा नाममात्र बनविल्याने पाणी समस्या अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. ३८ गावातील नागरिक आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे.मंजूर आराखड्यात उपाययोजनांचे टप्पेच अधिक पाडण्यात आलेले आहेत. विहीर अधिग्रहणात परजना, शहापूर, चिचगाव पिंपरी (ईजारा), पेंढारा याच गावांचा समावेश करण्यात आला. प्रत्यक्षात आंजती, मांगलादेवी, चिकणी डोमगा, पिंपळगाव काळे याशिवाय इतर गावात विहीर अधिग्रहणाची गरज आहे.टँकरने पाणीपुरवठ्यासाठी चिचगाव, पिंप्री इजारा, पेंढारा या गावांचा समावेश आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी यासह इतर २० गावे तहानलेली आहेत. तात्पुरती पुरक नळयोजनेत बाणगाव, बोंडगव्हान, मांगलादेवी, रत्नापूर, सिंदखेड, परजना गावांचा समावेश आहे. मुळात परजना येथे विहीर आहे. मात्र पाईपलाईन नसल्यावर तात्पुरती कोणती योजना प्रशासन करणार हा प्रश्न आहे. नळयोजना आहे, पण पाणी नाही अशी या गावाची अवस्था आहे.दरवर्षी नळयोजना विशेष दुरुस्तीच्या नावाने कृतीआराखडा तयार केला जातो. मात्र कायस्वरूपी दुरुस्ती कधी झाली नाही. हा निधी जातो कुठे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. धनज, पिंपळगाव (डुब्बा), सोनखास, उत्तरवाढोणा, वटफळी या गावांचा समावेश विशेष दुरुस्तीमध्ये आहे. अनेकदा आराखडे तयार झाले, प्रत्यक्षात दुरुस्ती झालेली नाही.खासगी विहीर अधिग्रहणासाठी पिंपळगाव काळे, बोरगाव, चिकणी डोमगा, चिखली कान्होबा, दहीफळ, धनज, दोनद खुर्द, रामगाव, जवळगाव, सारंगपूर, कोव्हळा, बोदगव्हान, खरडगाव, मालखेड (बु), मालखेड (खुर्द), मंगरूळ, सांवगा, शेंद्री (खुर्द), शिरजगाव, उत्तरवाढोणा, वाई, पारस, वटफळी आदी गावांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आला. या गावात कायमस्वरूपी योजनांची गरज आहे. परंतु याकडे गांर्भियाने कुणीही लक्ष देताना दिसत नाही.भीषणता कमी दाखविण्याचा खटाटोपनेर तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न भीषण झाला आहे. प्रशासनाकडून मात्र टप्प्या टप्प्याने उपायांची आखणी कृती आराखड्यात करण्यात आली आहे. भीषणता लपविण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जाते. एनवेळी केल्या जाणाºया उपाययोजना लोकांसाठी त्रासाच्या ठरणाºया आहेत. प्रत्यक्ष पाणीटंचाई असलेली गावेच कृती आराखड्यात नसल्याने ही शक्यता अधिक आहे.