शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सिंजेन्टा कंपनीविरोधात कीटकनाशक विषबाधितांचा स्विस कोर्टात खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:24 IST

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी 'पोलो' या धोकादायक कीटकनाशकावर बंदी घालण्यासाठी आणि पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सिंजेन्टा कंपनी विरोधात स्वित्झरलँड येथील बासेलच्या सिव्हिल कोर्टात खटला भरला आहे.

ठळक मुद्देभरपाईसाठी यवतमाळच्या शेतकऱ्यांनी दाखल केली याचिकापॅन इंडिया व एमएपीपीपीचा लढा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी 'पोलो' या धोकादायक कीटकनाशकावर बंदी घालण्यासाठी आणि पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सिंजेन्टा कंपनी विरोधात स्वित्झरलँड येथील बासेलच्या सिव्हिल कोर्टात खटला भरला आहे. या खटल्यात सिल्व्हियो रिसन, थिबाऊट मेयर हे युक्तिवाद करणार आहेत.खरीप-२०१७ च्या हंगामात राज्यातील हजारो कापूस उत्पादकांना कीटकनाशकाच्या फवारणीमुळे तीव्र विषबाधा होवून यांत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा एमएपीपीपीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी या विषयाला वाचा फोडली होती. पॅन इंडियाचे संचालक डॉ.नरसिम्हा रेड्डी यांनी कायदेशीर लढाईसाठी पुढाकार घेतला आहे.सिंजेंन्टा कंपनीच्या पोलो या कीटकनाशकांमुळे तीव्र विषबाधा होत असल्याचे पॅन इंडिया व पब्लिक आय च्या सर्वेक्षणात आढळून आलेले आहे. मात्र या कंपनीने आरोग्य व आर्थिक नुकसानीबाबत आपली जबाबदारी स्पष्टपणे झटकली. पोलोमुळे विषबाधा झाल्याचा कोणताही पुरावा नाही असे म्हणत स्वित्झरलँडच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधा प्रकरणावर केलेल्या माहितीपटावरही त्यांनी अधिकृतपणे आक्षेप घेतला.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेस्टीसाईड पॉईझन्ड पर्सनआणि पेस्टीसाईड एक्शन नेटवर्क (पॅन इंडिया) , एशिया पॅसेफिक (पॅन एपी) व स्विस वृत्तवाहिनीने या प्रकरणाची कागदपत्रे गोळा केली. तसेच पोलिसांनी सिजेंन्टाच्या कीटकनाशकसंबंधित ९६ प्रकरणाची नोंद केली आहे, त्यापैकी दोन प्रकरणात शेतक?्यांचा मृत्यू झाला असून एक शेतकरी अजूनही गंभीर आहे.पोलो या कीटकनाशकामध्ये डायफेनथुरोन हे घटक असून ते स्वित्झरलँड येथून आले. पोलोने विषबाधा झाल्यास त्यावर प्रतिरोधक औषध देखील नाही. या कंपनी कडून मानवी हक्काचे उल्लंघन झाले आहे, असा प्रकरणातील याचिकेत दावा करण्यात आला. सिंजेन्टा कंपनीने धोकादायक कीटकनाशक पोलो आणि ज्यामध्ये पीपीई किटची आवश्यकता आहे असे कीटकनाशक शेतकऱ्यांना विकू नये तसेच कंपनीने मृत्युमुखी पडलेल्या २, एक अति गंभीर व पीडित ५१ शेतकरी कुटुंबियांना नुकसान भरपाई व उपचार खर्च द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे असे एमएपीपीपी चे निमंत्रक देवानंद पवार यांनी सांगितले आहे.पोलो या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर ५१ पैकी ४४ जनांना गंभीर दुखापत झाली. त्यापैकी बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना तात्पुरते आंधळेपणा आले होते. १६ जन तर अनेक दिवस बेशुद्ध होते. काहींना मज्जातंतू आणि मांसपेशीचा त्रास होत आहे, परिणाम त्यांच्याकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही.विषबाधा प्रकरण हे मानवी हक्कांचे उल्लंघन असून याविरोधात न्यायालयीन लढा चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन देवानंद पवार व डॉ नरसिम्हा रेड्डी यांनी केले आहे. भारतातील अशा प्रकारच्या प्रकरणात परदेशात खटला चालविण्याची हि पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :Courtन्यायालयagricultureशेती