शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कर्जमाफीच्या यादीत घोडचुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:17 IST

सहकार विभागाला २४ तासांत शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले.

ठळक मुद्दे४१ हजार शेतकरी : रविवारी याद्या तपासताना गटसचिव वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहकार विभागाला २४ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले. मात्र या यादीतच अनेक घोडचूका असल्याने यादी तपासणीत जिल्हाभर प्रचंड गोंधळ उडाला.जिल्हा बँकेच्या ४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मात्र त्यांच्या आॅनलाईन यादीतच अनेक गंभर चुका आहेत. त्यामुळे सहकार विभागाने ही यादी दुरूस्तीसाठी आयटी विभागाकडे पाठविली. दुरूस्त झालेली यादी मात्र रविवारी सायंकाळपर्यंत गटसचिवांना मिळाली नाही. परिणामी त्यांची यादी तपासणीच रखडली. महिनाभरापूर्वी कर्जमाफीची घोषणा होऊनही एक छदामही जिल्ह्याला मिळाला नाही. आता हिवाळी अधिवेशनात सरकारला विरोधकांना तोंड द्यायचे आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या ४१ हजार शेतकºयांच्या खात्यात २१७ कोटी जमा करण्याच्या सूचना आहेत.या सूचनेनुसार येथील सहकार विभाग आणि बँकांनी रविवारी तातडीची बैठक घेतली. त्यात गटसचिवांना याद्या तपासणीच्या कामासाठी पाचारण करण्यात आले. रविवारी सकाळी ८ वाजतापासूनच गटसचिवांनी यादी तपासणीकरिता तालुकास्थळी हजेरी लावली. आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध यादी दुरूस्तीचे काम गटसचिवांनी हाती घेतले. मात्र या यादीत एकच नाव दोन ते तिनदा असल्याचे आढळून आले. कर्जाच्या रकमेतही तफावत होती. खाते क्रमांकातही गोंधळ होता. यामुळे उपलब्ध याद्या पुन्हा दुरूस्तीसाठी आयटी विभागाला पाठविण्यात आल्या. या याद्या तासभरात नव्याने मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात रविवरी सायंकाळी ६ वाजतापर्यंत गटसचिवांना सुधारित यादी मिळाली नाही. यामुळे जिल्हाभर गटसचिवांचा गोंधळ उडाला.या यादी तपासणीमुळे गटसचिव वैतागले होते.सहकार विभागाची यंत्रणा दक्षकर्जमाफीचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यासाठी तालुका पातळीवर रविवारी गटसचिवांना बोलावले गेले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार विभागाची यंत्रणा होती. प्रत्यक्षात आयटी विभागाने सुधारित याद्या पाठविल्या नाही. गटसचिव सहाय्यक निबंधक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याद्या कधी येणार म्हणून वारंवार विचारत होते. मात्र त्यांना रात्र झाली तरी तुम्हाला येथेच थांबावे लागेल, याद्या क्लिअर केल्यानंतरच पुढे जाता येईल, असे सांगितले जात होते. यामुळे गटसचिव चांगलेच वैतागले होते.