शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

कर्जमाफीच्या यादीत घोडचुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:17 IST

सहकार विभागाला २४ तासांत शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले.

ठळक मुद्दे४१ हजार शेतकरी : रविवारी याद्या तपासताना गटसचिव वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहकार विभागाला २४ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले. मात्र या यादीतच अनेक घोडचूका असल्याने यादी तपासणीत जिल्हाभर प्रचंड गोंधळ उडाला.जिल्हा बँकेच्या ४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मात्र त्यांच्या आॅनलाईन यादीतच अनेक गंभर चुका आहेत. त्यामुळे सहकार विभागाने ही यादी दुरूस्तीसाठी आयटी विभागाकडे पाठविली. दुरूस्त झालेली यादी मात्र रविवारी सायंकाळपर्यंत गटसचिवांना मिळाली नाही. परिणामी त्यांची यादी तपासणीच रखडली. महिनाभरापूर्वी कर्जमाफीची घोषणा होऊनही एक छदामही जिल्ह्याला मिळाला नाही. आता हिवाळी अधिवेशनात सरकारला विरोधकांना तोंड द्यायचे आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या ४१ हजार शेतकºयांच्या खात्यात २१७ कोटी जमा करण्याच्या सूचना आहेत.या सूचनेनुसार येथील सहकार विभाग आणि बँकांनी रविवारी तातडीची बैठक घेतली. त्यात गटसचिवांना याद्या तपासणीच्या कामासाठी पाचारण करण्यात आले. रविवारी सकाळी ८ वाजतापासूनच गटसचिवांनी यादी तपासणीकरिता तालुकास्थळी हजेरी लावली. आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध यादी दुरूस्तीचे काम गटसचिवांनी हाती घेतले. मात्र या यादीत एकच नाव दोन ते तिनदा असल्याचे आढळून आले. कर्जाच्या रकमेतही तफावत होती. खाते क्रमांकातही गोंधळ होता. यामुळे उपलब्ध याद्या पुन्हा दुरूस्तीसाठी आयटी विभागाला पाठविण्यात आल्या. या याद्या तासभरात नव्याने मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात रविवरी सायंकाळी ६ वाजतापर्यंत गटसचिवांना सुधारित यादी मिळाली नाही. यामुळे जिल्हाभर गटसचिवांचा गोंधळ उडाला.या यादी तपासणीमुळे गटसचिव वैतागले होते.सहकार विभागाची यंत्रणा दक्षकर्जमाफीचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यासाठी तालुका पातळीवर रविवारी गटसचिवांना बोलावले गेले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार विभागाची यंत्रणा होती. प्रत्यक्षात आयटी विभागाने सुधारित याद्या पाठविल्या नाही. गटसचिव सहाय्यक निबंधक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याद्या कधी येणार म्हणून वारंवार विचारत होते. मात्र त्यांना रात्र झाली तरी तुम्हाला येथेच थांबावे लागेल, याद्या क्लिअर केल्यानंतरच पुढे जाता येईल, असे सांगितले जात होते. यामुळे गटसचिव चांगलेच वैतागले होते.