शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्हा कचेरीतील कच-यावर ‘सर्जिकल स्ट्राइक’

By admin | Updated: May 4, 2017 18:41 IST

पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे मोल गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्याच प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार असल्याची

ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि.04 -  पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे मोल गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्याच प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार असल्याची बाब गुरूवारी चव्हाट्यावर आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतींमध्ये धूळ आणि कच-याचा तर खच आहेच; पण सोबतीला दारूच्या बॉटलही विखुरलेल्या आहेत. लोकजागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ स्टाईल सफाई आंदोलनाने नव्या को-या प्रशासकीय इमारतींमधली धूळ आणि सुस्तावलेल्या प्रशासनाची झोप उडविली. 
शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलनाची वाच्यता न करता लोकजागृती मंचचे शंभर-दीडशे कार्यकर्ते दुपारी एकच्या सुमारास जिल्हा कचेरी परिसरात शिरले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध विभागांची कार्यालये सुसज्ज प्रशासकीय इमारतींमध्ये आहेत. तब्बल पाच कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतींच्या भोवती दारूच्या बाटल्यांचा खच कार्यकर्त्यांना आढळून आला. ठिकठिकाणी सापडणा-या या बाटल्या कार्यकर्त्यांनी गोळा केल्या.  
माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या नेतृत्वात सर्वांनी हाती झाडू घेऊन संपूर्ण परिसर साफ केला. विविध कार्यालयांमध्ये जाऊन कोपरान् कोपरा झाडून काढला. त्यावेळी सर्वत्र नुसते धुळीचे लोट उठत होते. जिल्हा कचेरीच्या भिंतींवर, जिन्यावर पान खाऊन पिचका-या मारलेल्या आहेत. कॉरिडॉर धुळीने माखलेला आहे. एकेका कार्यालयात लोकजागृती मंचचे कार्यकर्ते झाडू घेऊन शिरत होते, तेव्हा उपस्थित कर्मचारी मख्खपणे त्यांची सफाई पाहात होते. हे काय चाललेय, असे विचारण्याची तसदी एकाही कर्मचा-याने घेतली नाही. कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे नवी कोरी प्रशासकीय इमारत कचरा डेपो बनल्याचे दृश्य यावेळी समोर आले. 
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह  यांना नुकताच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनातर्फे पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याच कार्यालयात स्वच्छ भारत मिशनची वाट लावली जात आहे. जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या पुरस्काराचा सन्मान राखायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गंधी, कचरा नसला पाहिजे. म्हणून आम्ही हे आंदोलन केले, असे लोकजागृती मंचचे देवानंद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शनिवारी मुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहेत. ते या अस्वच्छतेच्या प्रश्नावर काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी, तहसीलदार एखाद्या गावात गेले आणि तेथे अस्वच्छता आढळली की, ते गावक-यांना नोटीस देतात. आता जिल्हा कचेरीतील अस्वच्छतेबाबत कोण कुणाला नोटीस देणार, असा सवालही देवानंद पवार यांनी उपस्थित केला. 
या आंदोलनात लोकजागृती मंचचे देवानंद पवार यांच्यासह माजी सभापती शैलेश इंगोले, शालिकराव चवरडोल, हेमंत कांबळे, गोपाल चव्हाण, प्रदीप डंभारे, अजय डहाके, प्रवीण गुघाणे, मिथून अलाढे, अरविंद पाटील महल्ले, सुभाष नित आदी सहभागी झाले होते.
 
झाडू दिले प्रशासनाला भेट... 
संपूर्ण जिल्हा कचेरी परिसरात साफसफाई केल्यानंतर लोकजागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या कक्षाकडे मोर्चा वळविला. मात्र ते एका बैठकीला गेलेले होते. त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्या कक्षाच्या बंद द्वारापुढे आपापले झाडू ठेवून दिले. आपले कार्यालय नियमित स्वच्छ करण्यासाठी आमच्यातर्फे ही सप्रेम भेट, असे उपस्थित कर्मचा-यांना सांगत लोकजागृती मंचचे कार्यकर्ते निघून गेले.