शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी भूईमूग करपला

By admin | Updated: April 28, 2016 02:17 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिीतून सावरण्यासाठी उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली.

विहिरी कोरड्या : दोन हजार हेक्टर भाजीपालाही धोक्यात यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिीतून सावरण्यासाठी उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. भूईमुगाची तब्बल १५ हजार हेक्टरमध्ये पेरणी केली होती. मात्र आता एप्रिलमध्येच विहिरी व जलाशय कोरडे पडल्याने हे पीक करपायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप, रबी हंगामानंतर आता उन्हाळ्यातही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन, कापूस या पिकांनी मोठी निराशा केली. त्यानंतर हिवाळ्यातील गहू, हरभरा ही पिकेसुद्धा जेमतेमच हातात आली. किमान वर्षभराचा घर खर्च भागेल, इतके तरी उत्पन्न मिळविण्यासाठी आहे त्या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी १७ हजार हेक्टरमध्ये उन्हाळी पिकांची लागवड केली. यात सर्वाधिक भूईमूग, तीळ, भाजीपाला यांचा समावेश आहे. मात्र रणरणत्या उन्हात घाम गाळून फुलविलेली ही पिके आता डोळ्या देखतच करपताना पहावी लागत आहे. शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर जलाशयही कोरडे पडले आहे. तापमानही ४४ अंशावर पोहोचल्याने आता ही पिके जगविणे शक्य नाही. अनेकांना तर शेतातून भूईमूग उपडून आणण्याचीही सोय राहिलेले नाही. काकडी, टमाटर, भेंडी, पालक, सांभार ही भाजीपाला पिकेही शेतातच करपत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात एखादा पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी हा डाव मांडला होता. एकाएकी तापलेल्या उन्हाने पाण्याची पातळी खोल गेली. कधीही न आटणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी भूईमूग लागवडीसाठी एका एकारामागे १४ हजार ५०० रुपये गुंतवणूक केली आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी तब्बल ५५ कोटी रुपये खर्चून भूईमूग पीक लावले आहे. आता मात्र त्याच्या हाती लागवड खर्चही येणे शक्य नाही. एकरी तीन ते चार क्ंिवटलचे उत्पन्न निघत आहे. मे अखेर काढावा लागणारा भूईमूग पाण्याअभावी एप्रिल महिन्यातच काढला आहे. काहींना केवळ कुटार झाले तर अनेकांना तेही आणता आले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)