शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

१५ हजार हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी भूईमूग करपला

By admin | Updated: April 28, 2016 02:17 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिीतून सावरण्यासाठी उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली.

विहिरी कोरड्या : दोन हजार हेक्टर भाजीपालाही धोक्यात यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिीतून सावरण्यासाठी उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. भूईमुगाची तब्बल १५ हजार हेक्टरमध्ये पेरणी केली होती. मात्र आता एप्रिलमध्येच विहिरी व जलाशय कोरडे पडल्याने हे पीक करपायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप, रबी हंगामानंतर आता उन्हाळ्यातही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन, कापूस या पिकांनी मोठी निराशा केली. त्यानंतर हिवाळ्यातील गहू, हरभरा ही पिकेसुद्धा जेमतेमच हातात आली. किमान वर्षभराचा घर खर्च भागेल, इतके तरी उत्पन्न मिळविण्यासाठी आहे त्या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी १७ हजार हेक्टरमध्ये उन्हाळी पिकांची लागवड केली. यात सर्वाधिक भूईमूग, तीळ, भाजीपाला यांचा समावेश आहे. मात्र रणरणत्या उन्हात घाम गाळून फुलविलेली ही पिके आता डोळ्या देखतच करपताना पहावी लागत आहे. शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर जलाशयही कोरडे पडले आहे. तापमानही ४४ अंशावर पोहोचल्याने आता ही पिके जगविणे शक्य नाही. अनेकांना तर शेतातून भूईमूग उपडून आणण्याचीही सोय राहिलेले नाही. काकडी, टमाटर, भेंडी, पालक, सांभार ही भाजीपाला पिकेही शेतातच करपत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात एखादा पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी हा डाव मांडला होता. एकाएकी तापलेल्या उन्हाने पाण्याची पातळी खोल गेली. कधीही न आटणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी भूईमूग लागवडीसाठी एका एकारामागे १४ हजार ५०० रुपये गुंतवणूक केली आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी तब्बल ५५ कोटी रुपये खर्चून भूईमूग पीक लावले आहे. आता मात्र त्याच्या हाती लागवड खर्चही येणे शक्य नाही. एकरी तीन ते चार क्ंिवटलचे उत्पन्न निघत आहे. मे अखेर काढावा लागणारा भूईमूग पाण्याअभावी एप्रिल महिन्यातच काढला आहे. काहींना केवळ कुटार झाले तर अनेकांना तेही आणता आले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)