शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

१५ हजार हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी भूईमूग करपला

By admin | Updated: April 28, 2016 02:17 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिीतून सावरण्यासाठी उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली.

विहिरी कोरड्या : दोन हजार हेक्टर भाजीपालाही धोक्यात यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिीतून सावरण्यासाठी उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. भूईमुगाची तब्बल १५ हजार हेक्टरमध्ये पेरणी केली होती. मात्र आता एप्रिलमध्येच विहिरी व जलाशय कोरडे पडल्याने हे पीक करपायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप, रबी हंगामानंतर आता उन्हाळ्यातही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन, कापूस या पिकांनी मोठी निराशा केली. त्यानंतर हिवाळ्यातील गहू, हरभरा ही पिकेसुद्धा जेमतेमच हातात आली. किमान वर्षभराचा घर खर्च भागेल, इतके तरी उत्पन्न मिळविण्यासाठी आहे त्या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी १७ हजार हेक्टरमध्ये उन्हाळी पिकांची लागवड केली. यात सर्वाधिक भूईमूग, तीळ, भाजीपाला यांचा समावेश आहे. मात्र रणरणत्या उन्हात घाम गाळून फुलविलेली ही पिके आता डोळ्या देखतच करपताना पहावी लागत आहे. शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर जलाशयही कोरडे पडले आहे. तापमानही ४४ अंशावर पोहोचल्याने आता ही पिके जगविणे शक्य नाही. अनेकांना तर शेतातून भूईमूग उपडून आणण्याचीही सोय राहिलेले नाही. काकडी, टमाटर, भेंडी, पालक, सांभार ही भाजीपाला पिकेही शेतातच करपत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात एखादा पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी हा डाव मांडला होता. एकाएकी तापलेल्या उन्हाने पाण्याची पातळी खोल गेली. कधीही न आटणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी भूईमूग लागवडीसाठी एका एकारामागे १४ हजार ५०० रुपये गुंतवणूक केली आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी तब्बल ५५ कोटी रुपये खर्चून भूईमूग पीक लावले आहे. आता मात्र त्याच्या हाती लागवड खर्चही येणे शक्य नाही. एकरी तीन ते चार क्ंिवटलचे उत्पन्न निघत आहे. मे अखेर काढावा लागणारा भूईमूग पाण्याअभावी एप्रिल महिन्यातच काढला आहे. काहींना केवळ कुटार झाले तर अनेकांना तेही आणता आले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)