शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विद्युत कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:25 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणच्या कंत्राटदारांची देयकेच मिळाली नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची पाळी आली आहे.

ठळक मुद्देदेयके थकली : महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणच्या कंत्राटदारांची देयकेच मिळाली नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची पाळी आली आहे. याबाबत त्यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केल्यानंतर बुधवारपासून महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर साखळी उपोषण आरंभिले आहे.एप्रिल २०१७ पासून कामाचे देयके कंत्राटदारांनी सादर केले आहे. मंजूर देयकेही अद्याप अप्राप्त आहे. मार्च २०१५ ते मार्च २०१६ पर्यंतचे कृषिपंप विद्युत कनेक्शनचे देयकेही अप्राप्त आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कृषिपंप जोडण्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने महावितरणने मार्च २०१२ पासून प्रलंबित कृषिपंप विद्युत जोडण्यांसाठी सलग दोन वर्षे निविदा काढल्या. त्याअंतर्गत कंत्राटदारांनी कामे घेवून ती युद्धपातळीवर पूर्ण केली. मार्च २०१६ पर्यंत प्रलंबित तब्बल १७ हजार २०० कृषिपंप जोडण्या पूर्ण करण्यात आल्या. परंतु त्यानंतरही महावितरणने कंत्राटदारांच्या समस्येची दखल घेतली नाही आणि त्यांची देयके दिली नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कंत्राटदारांच्या मागे साहित्यपुरवठादार, मजूरवर्ग, वाहतूकदार व वित्त पुरवठादार यांनी पैशाचा तगादा लावला असून वीज कंत्राटदार सध्या त्रस्त आहे.उपोषण आंदोलनात अतुल पाटील, नीलेश काळे, मनोज गाढवे, राम कदम, प्रमोद डंबोले, पंकज ढेंबरे, गजेंद्र काकडे, रवींद्र फाळके, अतुल आसरकर, रवींद्र पवार, सचिन बिलोरिया, विजय नेसनतकर, प्रवीण किटे, अतुल अ. पाटील, सतीश ठाकरे, फारूक हुसेन, आकाश ढवळे, संजय शिरभाते, जाकीर हुसेन सुबेदार, संतोष इटकरे, रमेश बाभूळकर, राजू पवार, मनोज नवदुर्गे, प्रवीण हजारे, धीरज सोनटक्के आदी सहभागी झाले होते.