शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये यवतमाळ जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: July 20, 2015 02:29 IST

चालू जुलै महिन्यात पाऊसाने दगा दिल्यानंतर आता विदर्भात दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले आहे.

विजसची माहिती : विदर्भात दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या, शासन शेतकऱ्यांप्रती गंभीर नसल्याचा आरोपयवतमाळ : चालू जुलै महिन्यात पाऊसाने दगा दिल्यानंतर आता विदर्भात दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले आहे. मागील १५ दिवसापासून दर आठ तासाला एक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहे. मागील ४८ तासात विदर्भात आणखी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हयातील बोरीअरबचे श्रीकृष्ण इंगळे, टाकळीचे भाऊराव बंडेकर व बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्हयातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख व मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांच्या व अमरावती जिल्हयातील पापडचे अजय खाप्रीकार यांचा समावेश आहे. जुलै महिन्यातच विदर्भात ३८ तर एकट्या यवतमाळ जिल्हयात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यातसुद्धा यवतमाळ जिल्हयात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारी नोंद असून यात जुलै महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाटखेड गावात एका पाठोपाठ एक दोन आत्महत्या झाल्या. सध्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारातही उभे करीत नसून आतातर भारत सरकारच्या वतीने केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अढिया यांनी ८ जुलै रोजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र लिहून राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपासाठी महाराष्ट्र सरकारने सक्ती करू नये, अशा सूचना राज्यातील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्याबाबत सुचविले आहे. यामुळे राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहे व बँकाविरूद्ध कारवाई करू, अशी ओरड करणारे भाजप सरकारचे मंत्री आता यावर बोलण्यास तयार नाही, ही शोकांतिका असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.विदर्भ जनआंदोलन समितीने जुलै महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादीच पाठविली आहे. दिनेश धोंडे पोरगव्हान वर्धा, संतोष चटुले शेंदूरजना, अमरावती, पांडुरंग मडावी वाटखेड, यवतमाळ , अमोल वायले शिरसगाव, यवतमाळ, श्यामराव कोराडे भिवापूर, अमरावती, सतीश सिद्धराम गोहद, वर्धा, मारोतराव येटरे पांढरी, यवतमाळ, हरिहर करडे देऊळगाव, अकोला, नारायण ठाकरे पिंपळ विहीर, अमरावती, मौह्मद अखिल सौदागर काटपूर, अमरावती, प्रकाश चव्हाण कंधारी, यवतमाळ, अंतराम टेकाम आलेन्दूर, भंडारा, सतीश पोखले रोहीखेड, बुलढाणा, मनोहर वाटखुळे पवनार, वर्धा, यादव जीवतोडे शेम्बळ, चंद्रपूर, रामराव नैताम वाटखेड, यवतमाळ, पुडलिक उखाडे किन्ही, यवतमाळ, रामचंद्र कुम्बलकर वडनेर, वर्धा, रघुनाथ इंगळे खालेगाव, बुलढाणा, मांगीलाल आडे मनोरा, वाशीम देवीदास तायडे अहमदाबाद अमरावती, बळीराम भाटकर, मोरझडी, अकोला, शालिक गेडाम वाठोडा, यवतमाळ, विलास गावंडे कलाशी अमरावती, देवीदास केट धनज, वाशिम, बापूराव झाडे रावेरी यवतमाळ, रामेश्वर जामनिक कलाशी, अमरावती, पुंडलिक सुकलकर दाभा पहूर यवतमाळ, प्रमोद गावंडे उटी यवतमाळ, मनोहर कलंगी सलाई वर्धा, आनंदा राठोड बोथबोडण यवतमाळ, गणेश वाघ पेणटाकली बुलढाणा, यवतमाळ जिल्हयातील बोरीअरबचे श्रीकृष्ण इंगळे, टाकळीचे भाऊराव बंडेकर व बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्हयातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख व मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांच्या व अमरावती जिल्हयातील पापडचे अजय खाप्रीकर या ३८ शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. जेमतेम पाच लाख शेतकऱ्यांना बँकांनी नवीन पीककर्ज दिल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)