शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

जुलैमध्ये यवतमाळ जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: July 20, 2015 02:29 IST

चालू जुलै महिन्यात पाऊसाने दगा दिल्यानंतर आता विदर्भात दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले आहे.

विजसची माहिती : विदर्भात दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या, शासन शेतकऱ्यांप्रती गंभीर नसल्याचा आरोपयवतमाळ : चालू जुलै महिन्यात पाऊसाने दगा दिल्यानंतर आता विदर्भात दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले आहे. मागील १५ दिवसापासून दर आठ तासाला एक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहे. मागील ४८ तासात विदर्भात आणखी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हयातील बोरीअरबचे श्रीकृष्ण इंगळे, टाकळीचे भाऊराव बंडेकर व बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्हयातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख व मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांच्या व अमरावती जिल्हयातील पापडचे अजय खाप्रीकार यांचा समावेश आहे. जुलै महिन्यातच विदर्भात ३८ तर एकट्या यवतमाळ जिल्हयात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यातसुद्धा यवतमाळ जिल्हयात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारी नोंद असून यात जुलै महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाटखेड गावात एका पाठोपाठ एक दोन आत्महत्या झाल्या. सध्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारातही उभे करीत नसून आतातर भारत सरकारच्या वतीने केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अढिया यांनी ८ जुलै रोजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र लिहून राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपासाठी महाराष्ट्र सरकारने सक्ती करू नये, अशा सूचना राज्यातील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्याबाबत सुचविले आहे. यामुळे राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहे व बँकाविरूद्ध कारवाई करू, अशी ओरड करणारे भाजप सरकारचे मंत्री आता यावर बोलण्यास तयार नाही, ही शोकांतिका असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.विदर्भ जनआंदोलन समितीने जुलै महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादीच पाठविली आहे. दिनेश धोंडे पोरगव्हान वर्धा, संतोष चटुले शेंदूरजना, अमरावती, पांडुरंग मडावी वाटखेड, यवतमाळ , अमोल वायले शिरसगाव, यवतमाळ, श्यामराव कोराडे भिवापूर, अमरावती, सतीश सिद्धराम गोहद, वर्धा, मारोतराव येटरे पांढरी, यवतमाळ, हरिहर करडे देऊळगाव, अकोला, नारायण ठाकरे पिंपळ विहीर, अमरावती, मौह्मद अखिल सौदागर काटपूर, अमरावती, प्रकाश चव्हाण कंधारी, यवतमाळ, अंतराम टेकाम आलेन्दूर, भंडारा, सतीश पोखले रोहीखेड, बुलढाणा, मनोहर वाटखुळे पवनार, वर्धा, यादव जीवतोडे शेम्बळ, चंद्रपूर, रामराव नैताम वाटखेड, यवतमाळ, पुडलिक उखाडे किन्ही, यवतमाळ, रामचंद्र कुम्बलकर वडनेर, वर्धा, रघुनाथ इंगळे खालेगाव, बुलढाणा, मांगीलाल आडे मनोरा, वाशीम देवीदास तायडे अहमदाबाद अमरावती, बळीराम भाटकर, मोरझडी, अकोला, शालिक गेडाम वाठोडा, यवतमाळ, विलास गावंडे कलाशी अमरावती, देवीदास केट धनज, वाशिम, बापूराव झाडे रावेरी यवतमाळ, रामेश्वर जामनिक कलाशी, अमरावती, पुंडलिक सुकलकर दाभा पहूर यवतमाळ, प्रमोद गावंडे उटी यवतमाळ, मनोहर कलंगी सलाई वर्धा, आनंदा राठोड बोथबोडण यवतमाळ, गणेश वाघ पेणटाकली बुलढाणा, यवतमाळ जिल्हयातील बोरीअरबचे श्रीकृष्ण इंगळे, टाकळीचे भाऊराव बंडेकर व बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्हयातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख व मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांच्या व अमरावती जिल्हयातील पापडचे अजय खाप्रीकर या ३८ शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. जेमतेम पाच लाख शेतकऱ्यांना बँकांनी नवीन पीककर्ज दिल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)