शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
4
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
5
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
6
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
7
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
8
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
9
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
10
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
11
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
12
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
13
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
14
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
15
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
16
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
17
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
18
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
19
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
20
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली

‘वसंत’साठी ऊस उत्पादकांचे रणशिंग

By admin | Updated: September 27, 2015 02:01 IST

विदर्भात सहकारी तत्वावर सुरू असलेल्या एकमेव वसंत साखर कारखान्यासाठी सर्व पक्षाचे नेते एकवटले आहे.

पक्षभेद विसरून नेते एकवटले : हजारो शेतकऱ्यांची मेळाव्यामध्ये उपस्थितीउमरखेड : विदर्भात सहकारी तत्वावर सुरू असलेल्या एकमेव वसंत साखर कारखान्यासाठी सर्व पक्षाचे नेते एकवटले आहे. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही कारखान्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. या एकीच्या भावनेचे दर्शन शनिवारी झालेल्या मेळाव्यात घडले. हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या ऊस उत्पादकांनी कारखाना प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू व्हावा यासाठी संचालक मंडळाकडून कुठलाही पाठपुरावा केला जात नाही. म्हणून ऊस उत्पादक सभासद संघाने पोफाळी येथील कारखाना साईडवर मेळावा घेतला. मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर होते. आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, तातू देशमुख, राम देवसरकर, पंजाबराव खडकेकर, संदीप हिंगमिरे, साहेबराव कदम, बाळासाहेब चंद्रे यांच्यासोबत सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. वसंत साखर कारखाना जिवंत राहिला पाहिजे यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, असे मत अनेकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. आमदार नजरधने यांनी सांगितले की, ११ महिन्यांपासून पगार नाही, पगारासह इतर कामगारांना कारखान्याकडून जवळपास पाच कोटी येणे आहे. ऊस उत्पादक सभासदांना ऊसाचा भाव फरक ३०० रुपये प्रती टन याप्रमाणे सहा कोटी ५० लाख, ऊस तोडणी ठेकेदार व वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांना दोन कोटी, कामगारांचा प्रॉव्हिडंड फंड एक कोटी, साखरेचे पोते तारणावर घेतलेले ३५ कोटी, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पूर्व हंगामासाठी घेतलेले सात कोटी असे एकंदर ६० कोटी देणे आहे. एवढे कर्ज विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने कारखान्यावर करून ठेवले आहे. तरीही कारखाना सुरू व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. राम देवसरकर यांनी विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने कारखाना डबघाईस आणल्याचा आरोप केला. कारखान्याच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार उत्तमराव इंगळे, तातू देशमुख, भीमराव चंद्रवंशी, पंजाबराव खडकेकर, डॉ. गणेश घोडेकर आदींनीही विचार मांडले. कारखाना चालू करण्यासाठी उपस्थितांपुढे सूचना मांडल्या. गेल्या ४५ वर्षात प्रथमच वसंत कारखान्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. उमरखेड, महागाव, पुसद, हदगाव, हिमायतनगर या पाच तालुक्यातील १८ हजार ऊस उत्पादक सभासद आहेत. त्यांच्याकडे एकूण सहा लाख मे.टन ऊस उभा आहे. शेतामध्ये तो गाळपासाठी वसंत कारखान्याला दिला जातो. यावर्षी जर कारखाना बंद पडला तर ऊस उत्पादकांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे सर्व सभासदांनी एकत्र राहून कारखाना टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, डॉ. विठ्ठलराव चव्हाण, जगदीश नरवाडे, कल्याणराव माने, रमेश चव्हाण, चितांगराव कदम, अ‍ॅड़ माधवराव माने, देवराव दिवसे, अनंतराव चिकने, किशोर ठाकुर, रामराव गायकवाड, डॉ. धोंडेराव बोरूळकर, नितीन भुतडा, नागोराव कदम, बालाजी वानखेडे, विलास चव्हाण, डॉ. अनिल कनवाळे, शामराव सुरोशे, उत्तमराव राठोड, कामगार नेते पी.के. मुडे यांच्यासह सर्वच पक्षातील नेते मंडळी उपस्थित होती. (शहर प्रतिनिधी)