शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

लेंडी नाल्यामुळे गुदमरतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

पावसाळ्यात नाल्याला पूर येतो. पुराच्या पाण्यासाठी माती, झाडे, झुडुपे लगतच्या घरात व दुकानात शिरतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. त्याकडे यंत्रणेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. टेकडीकडील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी ठिकठिकाणी बांध टाकण्याची गरज आहे. तसेच नाल्याचे व त्यावरील पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्यामुळे नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. नाल्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत न झाल्यास येत्या पावसाळ्यातही नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. लेंडी नाल्यात ठिकठिकाणी पाणी साचून दुर्गंधी सुटली आहे. डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात याच नाल्याच्या पुराचे पाणी लगतची घरे आणि दुकानांमध्ये शिरून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पूर्वी शेतातून वाहणारा हा नाला आता ले-आऊट पडल्यामुळे शहराच्या मध्यभागी आला आहे. जलशुद्धीकरण केंद्रासमोरील टेकडीवरून रेल्वे स्टेशन परिसर, स्वप्नपूर्तीनगर, चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, महावीर काॅलनी, गोळीबार चौक व एका मंगल कार्यालयाजवळून हा नाला शहराबाहेर जातो. या नाल्याच्या दोन्ही बाजूने झुडूपे वाढली आहे. ठिकठिकाणी माती खचून सांडपाण्याचा प्रवाह अवरुद्ध झाला.पावसाळ्यात नाल्याला पूर येतो. पुराच्या पाण्यासाठी माती, झाडे, झुडुपे लगतच्या घरात व दुकानात शिरतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. त्याकडे यंत्रणेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. टेकडीकडील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी ठिकठिकाणी बांध टाकण्याची गरज आहे. तसेच नाल्याचे व त्यावरील पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. पालिका दरवर्षी केवळ मान्सूनपूर्व साफसफाई करून वेळ मारून नेते. मूळ समस्या मात्र कायम राहते. त्यामुळे निम्म्या शहरातील नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो.  नुकसानीनंतर सर्वेक्षण करण्यात आले. मात्र उपाययोजना झाली नाही. 

अनेकदा बसला तडाखा, २०१८ मध्ये कंबरभर पाण्यातून काढावा लागला रस्ता  - लेंडी नाल्याच्या पुराचा परिसरातील नागरिकांना अनेकदा तडाखा बसला. २०१८ मध्ये तर जून आणि ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे शेकडो घरे, दुकाने आणि वाहनांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. - शिवाजी स्टेडियम, बचत भवनमधील बॅडमिंटन कोर्ट उखडला होता. - शहराचे हृदयस्थान असणारा गोळीबार चौक, बसस्थानक परिसर, यवतमाळ आणि आर्णी मार्गावर कंबरभर पाणी साचले होते. 

नाल्यातील घाण पाण्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात सातत्याने पुराचा धोका असतो. घाण पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. - धनंजय बलखंडे

मागील वर्षी पुरामुळे घर खचले. अन्नधान्य, संपूर्ण साहित्य भिजून खराब झाले. यावर्षी तीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. लेंडी नाल्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. पालिकेने तातडीने उपाययाेजना करावी. - गणेश पाटील, पूरग्रस्त 

दोन वर्षांपूर्वी लेंडी नाल्याच्या पुराचे पाणी बचत भवनात शिरले होते. त्यामुळे येथील बॅडमिंटन कोर्टाचे लाखोंचे नुकसान झाले. अनेक दिवस खेळाडूंना खेळण्यापासून वंचित रहावे लागले. पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न व्हावेत. - किशोर घेरवरा, खेळाडू

लेंडी नाल्यापासून दुकान बरेच दूर असूनही पुराचे पाणी दुकानात शिरते. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण दुकान अक्षरश: पुराच्या पाण्याखाली गेले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने लेंडी नाल्यासह इतरही छोट्या नाल्यांचा बंदोबस्त करावा. - दिलीप शिंदे, व्यावसायिक

 

टॅग्स :floodपूर