शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी नाल्यामुळे गुदमरतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

पावसाळ्यात नाल्याला पूर येतो. पुराच्या पाण्यासाठी माती, झाडे, झुडुपे लगतच्या घरात व दुकानात शिरतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. त्याकडे यंत्रणेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. टेकडीकडील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी ठिकठिकाणी बांध टाकण्याची गरज आहे. तसेच नाल्याचे व त्यावरील पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्यामुळे नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. नाल्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत न झाल्यास येत्या पावसाळ्यातही नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. लेंडी नाल्यात ठिकठिकाणी पाणी साचून दुर्गंधी सुटली आहे. डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात याच नाल्याच्या पुराचे पाणी लगतची घरे आणि दुकानांमध्ये शिरून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पूर्वी शेतातून वाहणारा हा नाला आता ले-आऊट पडल्यामुळे शहराच्या मध्यभागी आला आहे. जलशुद्धीकरण केंद्रासमोरील टेकडीवरून रेल्वे स्टेशन परिसर, स्वप्नपूर्तीनगर, चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, महावीर काॅलनी, गोळीबार चौक व एका मंगल कार्यालयाजवळून हा नाला शहराबाहेर जातो. या नाल्याच्या दोन्ही बाजूने झुडूपे वाढली आहे. ठिकठिकाणी माती खचून सांडपाण्याचा प्रवाह अवरुद्ध झाला.पावसाळ्यात नाल्याला पूर येतो. पुराच्या पाण्यासाठी माती, झाडे, झुडुपे लगतच्या घरात व दुकानात शिरतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. त्याकडे यंत्रणेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. टेकडीकडील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी ठिकठिकाणी बांध टाकण्याची गरज आहे. तसेच नाल्याचे व त्यावरील पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. पालिका दरवर्षी केवळ मान्सूनपूर्व साफसफाई करून वेळ मारून नेते. मूळ समस्या मात्र कायम राहते. त्यामुळे निम्म्या शहरातील नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो.  नुकसानीनंतर सर्वेक्षण करण्यात आले. मात्र उपाययोजना झाली नाही. 

अनेकदा बसला तडाखा, २०१८ मध्ये कंबरभर पाण्यातून काढावा लागला रस्ता  - लेंडी नाल्याच्या पुराचा परिसरातील नागरिकांना अनेकदा तडाखा बसला. २०१८ मध्ये तर जून आणि ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे शेकडो घरे, दुकाने आणि वाहनांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. - शिवाजी स्टेडियम, बचत भवनमधील बॅडमिंटन कोर्ट उखडला होता. - शहराचे हृदयस्थान असणारा गोळीबार चौक, बसस्थानक परिसर, यवतमाळ आणि आर्णी मार्गावर कंबरभर पाणी साचले होते. 

नाल्यातील घाण पाण्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात सातत्याने पुराचा धोका असतो. घाण पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. - धनंजय बलखंडे

मागील वर्षी पुरामुळे घर खचले. अन्नधान्य, संपूर्ण साहित्य भिजून खराब झाले. यावर्षी तीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. लेंडी नाल्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. पालिकेने तातडीने उपाययाेजना करावी. - गणेश पाटील, पूरग्रस्त 

दोन वर्षांपूर्वी लेंडी नाल्याच्या पुराचे पाणी बचत भवनात शिरले होते. त्यामुळे येथील बॅडमिंटन कोर्टाचे लाखोंचे नुकसान झाले. अनेक दिवस खेळाडूंना खेळण्यापासून वंचित रहावे लागले. पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न व्हावेत. - किशोर घेरवरा, खेळाडू

लेंडी नाल्यापासून दुकान बरेच दूर असूनही पुराचे पाणी दुकानात शिरते. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण दुकान अक्षरश: पुराच्या पाण्याखाली गेले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने लेंडी नाल्यासह इतरही छोट्या नाल्यांचा बंदोबस्त करावा. - दिलीप शिंदे, व्यावसायिक

 

टॅग्स :floodपूर