शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

पुसद तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार

By admin | Updated: July 24, 2016 00:46 IST

अति पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार झाले आहेत.

वातावरण बदल : पावसामुळे रूग्णालयांत वाढली प्रचंड गर्दी पुसद : अति पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार झाले आहेत. घरगुती उपचार करूनही आराम मिळत असल्याने अनेक नागरिक रूग्णालयाकडे धाव घेत आहे. त्यामुळे शहरातील रूग्णालये हाउसफुल्ल दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, वातावरणातील चढउतर, अति पावसामुळे तालुक्यातील नागरिकांना सर्दी, पडसा, खोकला, तापाचे आजार बळावत आहेत. अनेकांना घशाचा आजार वाढत आहे. थंडी वाजून ताप येण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढले आहे. यावर नागरिक प्रथम घरगुती उपचार करतात. त्यातून आराम मिळाल्यास ते रूग्णालयाची वाट धरत नाही. मात्र आराम न मिळाल्यास त्यांना अखेर रूग्णालयाची वाट धरावीच लागते. वातावरणातील बदल आणि सततच्या पावसामुळे संसर्गजन्य विषाणूंची वाढ होण्यास मदत मिळते. सध्याचे वातावरण विषाणूंची वाढ होण्यास अत्यंत पोषक ठरत आहे. त्यामुळे पाण्यातून होणाऱ्या आजारांतही सतत वाढ होत आहे. यात शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुंमुळे नागरिकांना सर्दी, पडसा, डोकेदुखी, ताप, खोकला, पाठदुखी, अंगदुखी, उलटी, अतिसार आदी आजार बळावत आहे. अशा रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी शहरातील शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालयांतही गर्दी वाढू लागली आहे. या वातावरणाचा सर्वाधिक फटका चिमकुल्यांना बसत आहे. त्यामुळे पालक काळजीत सापडले आहेत. डॉक्टर मंडळी अशा वातावरणात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. नागरकिांनी पाणी उकळून प्राशन करावे. पाण्यात निर्जंतुक औषधांचा वापर करावा, असे आवहन केले जात आहे. सोबतच नगरपरिषदेने शुद्ध पाणी पुरवठा करणेही गरजेचे आहे. नागरिकांनाकडून नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामंपचायतींनी याबाबत दक्षता घेण्याची मागणी होत आहे. सध्या पावसामुळे नदी, नाल्यांना गढूळ पाणी येत आहे. तेच पाणी नागरिकांना पुरविले जात आहे. प्रथम हे पाणी शुद्ध करणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी साधे ब्लिचींग पावडरही पाण्यात टाकले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. शहरातही काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी) पाऊस, उन्हाचा लपाछपीचा खेळ सुरूच गेल्या १५ दिवसांपासून पुसद तालुक्यात पाऊस आणि उन्हाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. हे वातावरण विषाणुंसाठी अत्यंत पोषक ठरत आहे. त्यांच्यासाठी हे वातावरण नंदनवनच ठरले आहे. तापमानात सतत चढउतार सुरू आहे. त्यामुळे हवेत बाष्प निर्माण झाले, तर विषाणुंची संख्या वाढते. त्यातून विषाणुंचा संसर्ग बळावण्याची शक्यताही तेवढीच वाढते. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज साथ रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. या काळात हलका आहार घ्यावा. तसेच फळे व भाजीपाल्यांचा आहारात समावेश करावा. जेवणात आंबट पदार्थांचा वापर टाळावा. उघड्यावरील पदार्थ खावू नये. पाणी उकळूनच प्राशन करावे. शती पदार्थांचा वापरही टाळावा. ही खबरदारी घेतल्यास आजारापासून बचाव होण्याची शक्यता असल्याचे अनेक डॉक्टरांनी सांगितले.