शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार

By admin | Updated: July 24, 2016 00:46 IST

अति पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार झाले आहेत.

वातावरण बदल : पावसामुळे रूग्णालयांत वाढली प्रचंड गर्दी पुसद : अति पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार झाले आहेत. घरगुती उपचार करूनही आराम मिळत असल्याने अनेक नागरिक रूग्णालयाकडे धाव घेत आहे. त्यामुळे शहरातील रूग्णालये हाउसफुल्ल दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, वातावरणातील चढउतर, अति पावसामुळे तालुक्यातील नागरिकांना सर्दी, पडसा, खोकला, तापाचे आजार बळावत आहेत. अनेकांना घशाचा आजार वाढत आहे. थंडी वाजून ताप येण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढले आहे. यावर नागरिक प्रथम घरगुती उपचार करतात. त्यातून आराम मिळाल्यास ते रूग्णालयाची वाट धरत नाही. मात्र आराम न मिळाल्यास त्यांना अखेर रूग्णालयाची वाट धरावीच लागते. वातावरणातील बदल आणि सततच्या पावसामुळे संसर्गजन्य विषाणूंची वाढ होण्यास मदत मिळते. सध्याचे वातावरण विषाणूंची वाढ होण्यास अत्यंत पोषक ठरत आहे. त्यामुळे पाण्यातून होणाऱ्या आजारांतही सतत वाढ होत आहे. यात शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुंमुळे नागरिकांना सर्दी, पडसा, डोकेदुखी, ताप, खोकला, पाठदुखी, अंगदुखी, उलटी, अतिसार आदी आजार बळावत आहे. अशा रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी शहरातील शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालयांतही गर्दी वाढू लागली आहे. या वातावरणाचा सर्वाधिक फटका चिमकुल्यांना बसत आहे. त्यामुळे पालक काळजीत सापडले आहेत. डॉक्टर मंडळी अशा वातावरणात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. नागरकिांनी पाणी उकळून प्राशन करावे. पाण्यात निर्जंतुक औषधांचा वापर करावा, असे आवहन केले जात आहे. सोबतच नगरपरिषदेने शुद्ध पाणी पुरवठा करणेही गरजेचे आहे. नागरिकांनाकडून नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामंपचायतींनी याबाबत दक्षता घेण्याची मागणी होत आहे. सध्या पावसामुळे नदी, नाल्यांना गढूळ पाणी येत आहे. तेच पाणी नागरिकांना पुरविले जात आहे. प्रथम हे पाणी शुद्ध करणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी साधे ब्लिचींग पावडरही पाण्यात टाकले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. शहरातही काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी) पाऊस, उन्हाचा लपाछपीचा खेळ सुरूच गेल्या १५ दिवसांपासून पुसद तालुक्यात पाऊस आणि उन्हाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. हे वातावरण विषाणुंसाठी अत्यंत पोषक ठरत आहे. त्यांच्यासाठी हे वातावरण नंदनवनच ठरले आहे. तापमानात सतत चढउतार सुरू आहे. त्यामुळे हवेत बाष्प निर्माण झाले, तर विषाणुंची संख्या वाढते. त्यातून विषाणुंचा संसर्ग बळावण्याची शक्यताही तेवढीच वाढते. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज साथ रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. या काळात हलका आहार घ्यावा. तसेच फळे व भाजीपाल्यांचा आहारात समावेश करावा. जेवणात आंबट पदार्थांचा वापर टाळावा. उघड्यावरील पदार्थ खावू नये. पाणी उकळूनच प्राशन करावे. शती पदार्थांचा वापरही टाळावा. ही खबरदारी घेतल्यास आजारापासून बचाव होण्याची शक्यता असल्याचे अनेक डॉक्टरांनी सांगितले.