शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

४८ हजार शेतकऱ्यांचा अहवाल सादर करा

By admin | Updated: April 11, 2015 23:54 IST

राज्य शासनाने जाहीर केलेली ४८ हजार शेतकऱ्यांची दुष्काळी मदत बँक खाते नसल्याने परत गेली. ..

आयुक्तांचे आदेश : बँक खाते नसल्याने दुष्काळी मदतीचे पैसे परत गेल्याचे प्रकरण यवतमाळ : राज्य शासनाने जाहीर केलेली ४८ हजार शेतकऱ्यांची दुष्काळी मदत बँक खाते नसल्याने परत गेली. या प्रकरणाची गंभीर दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून खाते नसणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्यांचा तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. यानुसार १५ एप्रिलपर्यंत तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. शासनाने या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत जाहीर केली. जिल्ह्यातील चार लाख ४७ हजार ५६ शेतकरी दुष्काळी मदतीस पात्र ठरले होते. त्यासाठी २४४ कोटी ४१ लाख १८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यातील तीन लाख ९९ हजार ९१० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१२ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला. मात्र ४८ हजार शेतकऱ्यांचे बँक खाते शोधूनही सापडले नाही. आर्थिक वर्ष संपत आल्याने या शेतकऱ्यांचा २९ कोटी रुपयांचा निधी शासन जमा झाला. या संदर्भात तहसील प्रशासनाने विविध कारणे सादर केली आहे. मात्र प्रत्यक्षात काय घडले, बँक खाते का नव्हते, प्रशासनाने कोणत्या पद्धतीने शोध घेतला याबाबतचा अहवाल आता संबंधित तहसीलदारांना सादर करावा लागणार आहे. या अहवालानंतर राज्य शासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले असून परत गेलेला निधी पुन्हा मिळतो की काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (शहर वार्ताहर) निधीवर प्रश्नचिन्ह खाते नसलेल्या शेतकऱ्यांचा निधी परत गेला. मात्र यानंतर शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी पुढे येत आहे. खाते नंबर असताना तलाठ्याने नंबर दिला नाही. त्यामुळे मदत मिळाली नाही. यासह विविध तक्रारींचा यात समावेश आहे. मार्च अखेर परत गेलेला हा निधी परत येणार किंवा नाही यासाठी प्रशासनाला ठोस पुरावे द्यावे लागतील.