शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

४८ हजार शेतकऱ्यांचा अहवाल सादर करा

By admin | Updated: April 11, 2015 23:54 IST

राज्य शासनाने जाहीर केलेली ४८ हजार शेतकऱ्यांची दुष्काळी मदत बँक खाते नसल्याने परत गेली. ..

आयुक्तांचे आदेश : बँक खाते नसल्याने दुष्काळी मदतीचे पैसे परत गेल्याचे प्रकरण यवतमाळ : राज्य शासनाने जाहीर केलेली ४८ हजार शेतकऱ्यांची दुष्काळी मदत बँक खाते नसल्याने परत गेली. या प्रकरणाची गंभीर दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून खाते नसणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्यांचा तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. यानुसार १५ एप्रिलपर्यंत तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. शासनाने या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत जाहीर केली. जिल्ह्यातील चार लाख ४७ हजार ५६ शेतकरी दुष्काळी मदतीस पात्र ठरले होते. त्यासाठी २४४ कोटी ४१ लाख १८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यातील तीन लाख ९९ हजार ९१० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१२ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला. मात्र ४८ हजार शेतकऱ्यांचे बँक खाते शोधूनही सापडले नाही. आर्थिक वर्ष संपत आल्याने या शेतकऱ्यांचा २९ कोटी रुपयांचा निधी शासन जमा झाला. या संदर्भात तहसील प्रशासनाने विविध कारणे सादर केली आहे. मात्र प्रत्यक्षात काय घडले, बँक खाते का नव्हते, प्रशासनाने कोणत्या पद्धतीने शोध घेतला याबाबतचा अहवाल आता संबंधित तहसीलदारांना सादर करावा लागणार आहे. या अहवालानंतर राज्य शासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले असून परत गेलेला निधी पुन्हा मिळतो की काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (शहर वार्ताहर) निधीवर प्रश्नचिन्ह खाते नसलेल्या शेतकऱ्यांचा निधी परत गेला. मात्र यानंतर शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी पुढे येत आहे. खाते नंबर असताना तलाठ्याने नंबर दिला नाही. त्यामुळे मदत मिळाली नाही. यासह विविध तक्रारींचा यात समावेश आहे. मार्च अखेर परत गेलेला हा निधी परत येणार किंवा नाही यासाठी प्रशासनाला ठोस पुरावे द्यावे लागतील.