शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे हानीच्या मोबदल्याचा अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 21:35 IST

हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे.

ठळक मुद्दे१३ सदस्यीय स्वतंत्र समिती स्थापन : जिल्ह्यातील गावात जाऊन करणार नुकसानीचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे. या समितीत १३ सदस्य आहेत. विविध गावांमधून शेतकऱ्यांशी चर्चा करून समिती मोबदला देण्याचे निकष ठरविणार आहे.वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचा शेतात किंवा शेतालगतच्या परिसरात वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर शेताकडे फिरकू शकत नाहीत. परिणामी शेतातील कामे खोळंबतात. याचा उत्पादनावर परिणाम होतो. शेतमजुरांची दैनंदिन मजुरी बुडते. याचा अभ्यास करून आर्थिक मोबदला देण्याचे निकष ठरविण्यात येणार आहे. शिवाय नुकसानीची ओळख पटविण्याकरिता, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि नुकसानभरपाई देण्याकरिता अटी व शर्थी निश्चित केल्या जाणार आहेत. वन्यप्राण्यांपासून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याकरिता इतर काही राज्यांनीही निकष ठरविले आहे. तेथील विविध पद्धतींचा अभ्यास करून महाराष्टÑात गठण करण्यात आलेली समिती अहवाल तयार करणार आहे. समिती वन्यप्राण्यांच्या नुकसानीसंदर्भात अभ्यास करून स्पष्ट अहवाल तीन महिन्याच्या आत राज्य शासनाकडे सादर करणार आहे. समितीचे अध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर हे आहेत. सदस्यांमध्ये विनोद तिवारी, तसनीम अहमद, संजीव गौड, आर.के. वानखडे, गजेंद्र नरवने, अ‍ॅड. फिर्दोस मिर्झा, सुहास तुळजापूरकर, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील मुग्धा चांदूरकर, इम्तियाज खैर्दी, नितेश भुतेकर, मोहन जाधव, रवीकिरण गोवेकर यांचा समावेश आहे.वन्यप्राण्यांच्या नुकसानीला विमा संरक्षणवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणे अथवा शेतातील पिकांचे नुकसान होणे यासाठी विमा संरक्षण योजना कार्यान्वित करता येऊ शकते का याचाही अभ्यास समिती करीत आहे. तसे झाल्यास हवामान विम्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांंना आपल्या पिकांचा विमा उतरवून वन्यप्राण्यांनी पीकाचे नुकसान केल्यास नुकसानभरपाई विम्याच्या स्वरूपात मिळविता येणे शक्य होईल का याची पडताळणी सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती