शहरं
Join us  
Trending Stories
1
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
2
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
3
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
4
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
5
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
6
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
7
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
8
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
9
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
10
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
11
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
12
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
13
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
14
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
15
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
16
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
17
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
18
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
19
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
20
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

वन्यप्राण्यांमुळे हानीच्या मोबदल्याचा अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 21:35 IST

हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे.

ठळक मुद्दे१३ सदस्यीय स्वतंत्र समिती स्थापन : जिल्ह्यातील गावात जाऊन करणार नुकसानीचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे. या समितीत १३ सदस्य आहेत. विविध गावांमधून शेतकऱ्यांशी चर्चा करून समिती मोबदला देण्याचे निकष ठरविणार आहे.वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचा शेतात किंवा शेतालगतच्या परिसरात वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर शेताकडे फिरकू शकत नाहीत. परिणामी शेतातील कामे खोळंबतात. याचा उत्पादनावर परिणाम होतो. शेतमजुरांची दैनंदिन मजुरी बुडते. याचा अभ्यास करून आर्थिक मोबदला देण्याचे निकष ठरविण्यात येणार आहे. शिवाय नुकसानीची ओळख पटविण्याकरिता, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि नुकसानभरपाई देण्याकरिता अटी व शर्थी निश्चित केल्या जाणार आहेत. वन्यप्राण्यांपासून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याकरिता इतर काही राज्यांनीही निकष ठरविले आहे. तेथील विविध पद्धतींचा अभ्यास करून महाराष्टÑात गठण करण्यात आलेली समिती अहवाल तयार करणार आहे. समिती वन्यप्राण्यांच्या नुकसानीसंदर्भात अभ्यास करून स्पष्ट अहवाल तीन महिन्याच्या आत राज्य शासनाकडे सादर करणार आहे. समितीचे अध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर हे आहेत. सदस्यांमध्ये विनोद तिवारी, तसनीम अहमद, संजीव गौड, आर.के. वानखडे, गजेंद्र नरवने, अ‍ॅड. फिर्दोस मिर्झा, सुहास तुळजापूरकर, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील मुग्धा चांदूरकर, इम्तियाज खैर्दी, नितेश भुतेकर, मोहन जाधव, रवीकिरण गोवेकर यांचा समावेश आहे.वन्यप्राण्यांच्या नुकसानीला विमा संरक्षणवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणे अथवा शेतातील पिकांचे नुकसान होणे यासाठी विमा संरक्षण योजना कार्यान्वित करता येऊ शकते का याचाही अभ्यास समिती करीत आहे. तसे झाल्यास हवामान विम्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांंना आपल्या पिकांचा विमा उतरवून वन्यप्राण्यांनी पीकाचे नुकसान केल्यास नुकसानभरपाई विम्याच्या स्वरूपात मिळविता येणे शक्य होईल का याची पडताळणी सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती