शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांचा कोंडमारा

By admin | Updated: October 10, 2016 02:02 IST

आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकारी,

फाटलेल्या गाद्या : किचनमध्ये अस्वच्छता, गैरसोयीचा करावा लागतो सामना यवतमाळ : आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकारी, ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयीकरिता कारणीभूत असणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावे, अशी मागणी अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेने केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने लोटले तरी येथील वसतिगृहात अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. वसतिगृहात वाढीव जागा येऊनही प्रवेश प्रक्रिया बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काची कुचंबणा होत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वसतिगृहात प्रवेश झालेले आहेत, त्यांनाही अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पुस्तके, वह्या, स्टेशनरी साहित्य, स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आलेली नाही. ठरलेल्या मेन्यूप्रमणे विद्यार्थ्यांना भोजन दिले जात नाही. सकाळचा नास्ता, दोन वेळचे भोजन न देता निकृष्ट भोजन दिले जात आहे. पिण्याचे पाणीही अशुद्ध आहे. पाण्याच्या टाकीची जागा अतिशय घाण आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये गुरांप्रमाणे कोंडले जात आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणात झोपण्याकरिता पुरेशी जागा, प्रसाधनाची व्यवस्था नाही. झोपण्याचे बेडही अत्यंत दयनीय आहे. ब्लँकेट, बेडशिटचा पुरवठा अजूनही करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुलांना वाईट अवस्थेत झोपावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास वसतिगृहात इन्व्हर्टरची व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा अंधारातच झोपावे लागते. अभ्यासावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन द्यावी, त्यावर त्वरित बांधकाम करण्यात यावे, शासकीय सुविधा विद्यार्थ्यांना न पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन देणाऱ्या मेस ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या जिल्हाध्यक्ष मनिषा तिराणकर, गीत घोष, शुभम तिरणकर, संकेत दैवत, सुमित देवतळे, अभिजित राठोड, ऋषिकेश खोडे, कुलदीप विघने, यशश्री श्रीवास्तव, लुही परचाके, स्नेहल केळकर, अंकिता केळकर, निकिता आंबेकर, राधा वाट उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)