शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:05 IST

लॉकडाऊनमुळे आगारात अडकून पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाश्यांना दिलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत प्रवाश्यांचे हित जपले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाखो सामान्य प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देवंचित घटकांना आता योजनेचा लाभ घेता येणार

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे आगारात अडकून पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाश्यांना दिलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत प्रवाश्यांचे हित जपले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाखो सामान्य प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रिदनुसार एसटी धावून गेली आणि पुन्हा आगारात मुक्कामाला आली. एसटी बंद असल्यामुळे विविध घटकांतील प्रवाश्यांना एसटीच्या योजनांपासून मुकावे लागण्याची भीती होती. राज्यात एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ घटकांना ३३ टक्क््यांपासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवाश्यांनी आधार क्रमांकाशी लिंक असलेले स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे. ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती. मात्र २१ मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांना स्मार्टकार्डसाठीची प्रक्रिया या कालावधीत करता आली नाही. यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर या प्रवाश्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्यांनी अद्यापही स्मार्ट कार्ड काढता आले नाही त्यांच्यासाठीही ही बाब दिलासादायक आहे.एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच मुदतवाढ दिली होती. लॉकडाऊनमुळे अनेकांना एसटी महामंडळाच्या सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्टकार्ड काढता आले नाही. ही बाब विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने स्मार्टकार्ड काढण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.- आर. एन. पाटीलविभागीय नियंत्रक, चंद्रपूर

 

 

 

 

टॅग्स :state transportएसटी