शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाहतूक सुरू होताच एसटीचे उत्पन्न ३७ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

दिवाळीनंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिली पसंती मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बसफेऱ्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. लांब पल्ल्यांच्या बसमध्ये अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सांगली, नांदेड या गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी मिळाले आहे.  दरवर्षी पुण्यावरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी दिवाळीपूर्वीच गावी आल्याने एसटीला या उत्पन्नास मुकावे लागले. पुढील काळात एसटी पूर्वप्रमाणेच उत्पन्न वाढेल.

ठळक मुद्देदररोज ४२ हजार प्रवाशांची वर्दळ

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :   कोरोनामुळे एसटीचा प्रवास बंद झाला होता. राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केल्यानंतरही प्रवासी बसमध्ये जाण्यासाठी तयार नव्हते. दिवाळीपूर्वी फार कमी गर्दी बसमध्ये होती. मात्र दिवाळी संपताच हे चित्र बदलले आहे. दर दिवसाला ४२ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. यातून राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न ३७ लाखांवर पोहोचले आहे. दिवाळीनंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिली पसंती मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बसफेऱ्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. लांब पल्ल्यांच्या बसमध्ये अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सांगली, नांदेड या गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी मिळाले आहे. दरवर्षी पुण्यावरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी दिवाळीपूर्वीच गावी आल्याने एसटीला या उत्पन्नास मुकावे लागले. पुढील काळात एसटी पूर्वप्रमाणेच उत्पन्न वाढेल. हे उत्पन्न ७० लाखापर्यंत जाईल, अशी आशा आहे. कोरोना आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सॅनिटायझरचा स्प्रे बंधनकारक करण्यात आला आहे. 

दररोज सॅनिटायझर वाढविण्याची गरजप्रत्येक आगाराने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर फवारणी बंधनकारक आहे. मात्र वाढलेली गर्दी पाहता या नियमाचे पालन होत नाही. बसमध्ये प्रवासी खचाखच भरलेले असतात. अशा परिस्थितीत सॅनिटायझरचा फवारा करताच येत नाही. हा फवारा झाल्यास प्रवसी अधिक सुरक्षित होतील.  

फिजिकल डिस्टन्सचा उडतोय बोजवाराबसफेऱ्या कमी आणि प्रवासी जास्त अशा परिस्थितीत बसमध्ये जागा नसल्यामुळे अनेकांना उभे राहात प्रवास करावा लागतो. या परिस्थितीत दोन जागेच्या सीटवर तीन जण बसलेले असतात. कंडक्टरलाही तिकीट काढण्यासाठी दाटीहून पुढे मार्ग काढावा लागतो. 

एसटीचा प्रवास सर्वाधिक सुरक्षितराज्य परिवहन महामंडळाने एसटी बस सुरू करताच खासगी वाहनांकडे प्रवास भाडे कमी झाले आहे. सर्वाधिक सुरक्षित सेवा म्हणून प्रवासी एसटीकडे वळले आहे. ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रवासीदिवाळीनंतर माहेरी जाण्यासाठी गृहिणी मोठ्या प्रमाणात प्रवासाला निघाल्या आहे. गावखेड्यातून प्रवासी मोठ्या प्रमाणात शहराकडे आणि जिल्ह्यातील इतर गावांकडे वळले. 

टॅग्स :state transportएसटी