शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष कमी होणार नाही

By admin | Updated: August 31, 2015 02:19 IST

मला वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचा अध्यक्ष केले. याचा अर्थ माझा संघर्ष काही कमी होणार नाही.

किशोर तिवारी : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन; अधिकाऱ्यांनो, राजकीय दबावाला बळी पडू नका !पुसद : मला वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचा अध्यक्ष केले. याचा अर्थ माझा संघर्ष काही कमी होणार नाही. एक आंदोलक म्हणून हा मिशनचा झेंडा हाती घेतला आहे. गरिबांसाठी देवाणं पाठविलेला माणूस म्हणून माझी भूमिका राहणार आहे, असे वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर किशोर तिवारी प्रथमच पुसदमध्ये आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी या मिशनचा उद्देश स्पष्ट केला. राज्यातील १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना अंत्योदय अंतर्गत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचा लाभ ५० हजार शेतकऱ्यांंना मिळणार आहे, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. अंत्योदयच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांपर्यंत शासनाची योजना पोहोचवावी, त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपली पूर्वी सारखीच भूमिका ताठर राहील काय, असे विचारले असता तिवारी म्हणाले, काँग्रेसची सत्ता १५ वर्ष होती. काँग्रेसला आम्ही सहकार्य केले. परंतु त्यांनी आम्हाला सहकार्यच केले नाही. नंतर भाजपाला निवडणुकीत पूर्ण सहकार्य केले. भाजपानेही १५ वर्ष संघर्ष केला. या संघर्षातूनच आम्ही त्यांची साथ दिली. मुख्यमंत्र्यांनी आग्रह केल्यानेच स्वावलंबन मिशनचा अध्यक्ष झालो. शेतकरी आत्महत्यासंदर्भात किंवा इतरही समस्यांविषयी सरकार सोबत सहकार्य राहील. वेळप्रसंगी ताठर भूमिका घेऊ असेही त्यांनी सांगितले. राज्यात कोणताही शेतकरी अन्नावाचून राहू नये यासाठी शासनाने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकरी व शेतमजुरांना बीपीएल योजनेतून राशन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलजावणी सुरू झाली आहे. पत्रपरिषदेपूर्वी किशोर तिवारी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकरी आत्महत्या व त्यांच्या प्रश्नांची सांगड कशी घालावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये असा सल्ला देत आपल्याशी दूरध्वनीवरून कधीही संपर्क साधू शकता, असे ते म्हणाले. बैठकीला उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, तहसीलदार भगवान कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)