शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक फिरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना ५०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना २०० रूपयांचा दंड केला जाणार आहे.

ठळक मुद्देथुंकल्यास ५०० रूपये दंड : दुसऱ्यांदा आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा नोंदविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. या सुमारास जिल्ह्यातील नागरिक मास्क न लावता फिरत आहे. मॉर्निंग वॉकच्या नावावर तरूण-तरूणी बिनधास्त फिरत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून अशा नागरिकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रथम आढळले तर ५०० रूपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळले तर थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना ५०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना २०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानामध्ये सोशल डिस्टन्स न पाळल्यास या ठिकाणी दुकानदाराला दोन हजाराचा दंड आणि ग्राहकांना प्रत्येकी २०० रूपयाचा दंड आहे. दुकानदारांनी वस्तूंच्या किमतीचे फलक बाहेर न लावल्यास त्यांना दोन हजार रूपयांचा दंड केला जाणार आहे.मॉर्निंग वॉकच्या आडून नियमभंगजिल्हाधिकारी एम. डी. सिंह गुरुवारी नेहरू स्टेडियमवर गेले. यावेळी त्यांना शहरातील युवक आणि युवती चेहºयाला मास्क न लावता बिनधास्त फिरताना दिसले. याशिवाय गप्पा करताना ही मंडळी आढळली. याचप्रमाणे वयोवृद्धही बाहेर फिरताना दिसले. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहेत. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ब्रेक लागणार आहे. हा नियम मोडित काढणाऱ्यांना फौजदारीला सामोरे जावे लागणार आहे.ग्रामीण भागात मास्कचा वापरच नाहीग्रामीण भागात मास्क न लावता लोक फिरतात. ग्रामीण भागातही कोरोना शिरला आहे. त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दोनशेचा दंड करण्याचे आदेश आहेत.नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे. मास्क वापरावे आणि अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. तरच या आजारातून सुटका होईल.- एम.डी.सिंह, जिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस