शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अनावश्यक फिरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना ५०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना २०० रूपयांचा दंड केला जाणार आहे.

ठळक मुद्देथुंकल्यास ५०० रूपये दंड : दुसऱ्यांदा आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा नोंदविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. या सुमारास जिल्ह्यातील नागरिक मास्क न लावता फिरत आहे. मॉर्निंग वॉकच्या नावावर तरूण-तरूणी बिनधास्त फिरत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून अशा नागरिकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रथम आढळले तर ५०० रूपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळले तर थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना ५०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना २०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानामध्ये सोशल डिस्टन्स न पाळल्यास या ठिकाणी दुकानदाराला दोन हजाराचा दंड आणि ग्राहकांना प्रत्येकी २०० रूपयाचा दंड आहे. दुकानदारांनी वस्तूंच्या किमतीचे फलक बाहेर न लावल्यास त्यांना दोन हजार रूपयांचा दंड केला जाणार आहे.मॉर्निंग वॉकच्या आडून नियमभंगजिल्हाधिकारी एम. डी. सिंह गुरुवारी नेहरू स्टेडियमवर गेले. यावेळी त्यांना शहरातील युवक आणि युवती चेहºयाला मास्क न लावता बिनधास्त फिरताना दिसले. याशिवाय गप्पा करताना ही मंडळी आढळली. याचप्रमाणे वयोवृद्धही बाहेर फिरताना दिसले. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहेत. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ब्रेक लागणार आहे. हा नियम मोडित काढणाऱ्यांना फौजदारीला सामोरे जावे लागणार आहे.ग्रामीण भागात मास्कचा वापरच नाहीग्रामीण भागात मास्क न लावता लोक फिरतात. ग्रामीण भागातही कोरोना शिरला आहे. त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दोनशेचा दंड करण्याचे आदेश आहेत.नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे. मास्क वापरावे आणि अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. तरच या आजारातून सुटका होईल.- एम.डी.सिंह, जिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस