शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

दमदार पाऊस तरीही प्रकल्प तहानलेलेच

By admin | Updated: July 18, 2016 00:49 IST

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असला तरी मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे.

४७८ मिमी नोंद : मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये निम्माच जलसाठा, पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांची स्थितीही जेमतेम यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असला तरी मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे. वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस पडूनही प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झाला नाही. बहुतांश प्रकल्पात क्षमतेच्या अर्धा अधिक जलसाठा झाला असून या प्रकल्पांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा, पाच मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी याप्रकल्पाचा उपयोग होता. अलिकडच्या काही वर्षात अपुऱ्या पावसाने या प्रकल्पात पुरेसा जलसाठा झालाच नाही. मात्र यंदा वरूण राजाच्या कृपेने जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरतील, अशी आशा आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७८ मिमी पाऊस कोसळला आहे. नदी, नाल्यांना पूर आला होता. मात्र प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा झाला नाही. पुसद तालुक्यातील पूस प्रकल्पात ३९ टक्के, दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात २५.६१ टक्के, बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात २९ टक्के, दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्पात ६० टक्के, यवतमाळ तालुक्यातील वाघाडी प्रकल्पात ४५ टक्के, बोरगाव प्रकल्पात ६७ टक्के, महागाव तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस प्रकल्पात ५२ टक्के, अडाण प्रकल्पात २७.९३ टक्के आणि मारेगाव तालुक्यातील नवरगाव प्रकल्पात ६४.५३ टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पापैकी केवळ पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या प्रकल्पात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांमध्ये ५२ टक्के जलसाठा झाला असून त्यापैकी कापरा, सिंगनडोह, रूई, इठोडा, किन्ही, पहूर, नरसाळा, पोफाळी, पोखरी, निंगनूर, दराटी, तरोडा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र इतर प्रकल्पात अद्यापही निम्माच जलसाठा आहे. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. सध्याही ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा जलसाठा निश्चितच वाढणार आहे. हे प्रकल्प तुडुंब झाल्यास रबी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. (नगर प्रतिनिधी)