शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पाऊस तरीही प्रकल्प तहानलेलेच

By admin | Updated: July 18, 2016 00:49 IST

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असला तरी मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे.

४७८ मिमी नोंद : मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये निम्माच जलसाठा, पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांची स्थितीही जेमतेम यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असला तरी मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे. वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस पडूनही प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झाला नाही. बहुतांश प्रकल्पात क्षमतेच्या अर्धा अधिक जलसाठा झाला असून या प्रकल्पांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा, पाच मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी याप्रकल्पाचा उपयोग होता. अलिकडच्या काही वर्षात अपुऱ्या पावसाने या प्रकल्पात पुरेसा जलसाठा झालाच नाही. मात्र यंदा वरूण राजाच्या कृपेने जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरतील, अशी आशा आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७८ मिमी पाऊस कोसळला आहे. नदी, नाल्यांना पूर आला होता. मात्र प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा झाला नाही. पुसद तालुक्यातील पूस प्रकल्पात ३९ टक्के, दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात २५.६१ टक्के, बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात २९ टक्के, दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्पात ६० टक्के, यवतमाळ तालुक्यातील वाघाडी प्रकल्पात ४५ टक्के, बोरगाव प्रकल्पात ६७ टक्के, महागाव तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस प्रकल्पात ५२ टक्के, अडाण प्रकल्पात २७.९३ टक्के आणि मारेगाव तालुक्यातील नवरगाव प्रकल्पात ६४.५३ टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पापैकी केवळ पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या प्रकल्पात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांमध्ये ५२ टक्के जलसाठा झाला असून त्यापैकी कापरा, सिंगनडोह, रूई, इठोडा, किन्ही, पहूर, नरसाळा, पोफाळी, पोखरी, निंगनूर, दराटी, तरोडा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र इतर प्रकल्पात अद्यापही निम्माच जलसाठा आहे. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. सध्याही ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा जलसाठा निश्चितच वाढणार आहे. हे प्रकल्प तुडुंब झाल्यास रबी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. (नगर प्रतिनिधी)