शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मानव विकासमधून आरोग्य सुविधेला बळकटी

By admin | Updated: June 29, 2015 00:00 IST

जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सुविधेला अधिक बळकट करण्यासाठी मानव विकास योजनेचा आधार घेतला जाणार आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सुविधेला अधिक बळकट करण्यासाठी मानव विकास योजनेचा आधार घेतला जाणार आहे. आरोग्य सेवेला अधिक गतिमान बनविण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आढावा बैठक घेतली. या बैैैैठकीत अधिकाऱ्यांना आरोग्य उपकेंद्राला आठवड्यातून किमान एक भेट देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी. राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यासह मानव विकास मिशनमधील नऊ तालुक्यांचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना केल्या. आवश्यकता नसताना यासाठी रुग्णांना तालुका किंवा जिल्हास्तरावरील रुग्णालयात पाठविल्या जाऊ नये, प्रसूतीचे रुग्ण किचकट किंवा अन्य कारणास्तवच वरील रुग्णालयात पाठविल्या जावे. उपकेंद्रातील प्रसूतीचे प्रमाण कमी राहिल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.शासकीय रुग्णालयांमध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यासोबतच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा सत्र मोहिम राबवावी. या मोहिमेंतंर्गत गावपातळीवर गरोदर माता, जोखमी मातांची तपासणी करून त्यांना संदर्भसेवा उपलब्ध करून दिल्या जाव्या. उपकेंद्रातील कामकाजाला गती देण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनदा सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान उपकेंद्राला भेट द्यावी. तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आठवड्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन उपकेंद्रांना सदर वेळी भेट देण्याची सूचना केली. यामुळे उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास सवय लागेल, असे ते म्हणाले.मानव विकास मिशनचा आढावा घेतांना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य शिबीर, बुडीत मजुरी, अभ्यासिका, गरोदर मातांची आरोग्य तपासणी, माती परीक्षण, बालगृह, मानव विकासच्या बस आदींचा आढावा घेतला. मिशनमधून व्यावसायिक प्रशिक्षण दिलेल्या किती उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला याची माहिती सादर करण्याची सूचना त्यांनी केली.मानव विकास मिशनमध्ये जिल्ह्यातील सोळा तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा आत्महत्याग्रस्त असून नापिकी व दुष्काळाने शेतकरी हवालदिल आहे. मानव विकासमधून बऱ्यापैकी ग्रामीण पातळीवर सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे. त्यासाठी सर्व तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्यासोबतच उर्वरित सात तालुके मिशनमध्ये समाविष्ट करण्याचीे सूचना त्यांनी केली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत नाराजी व्यक्त करत ही संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागास दिले. (कार्यालय प्रतिनिधी)