शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दूध, तेलाची ‘ताकद’ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:16 IST

मानवी शरीराला अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन्स अन्नद्रव्यांमधून पुरेशा मात्रेत मिळत नाही. परिणामी याची डिफीसेन्सी (कमतरता) आढळून येते. ही उणीव भरुन काढण्यासाठी दैनंदिन सेवनातील दूध व खाद्य तेलाला आणखी पौष्टिक केले जाणार आहे.

ठळक मुद्देडिफीसेन्सी दूर करण्यासाठी व्हिटॅमिन्स । अन्नद्रव्यात जीवनसत्त्वाच्या पूर्ततेचा प्रशासनाचा प्रयत्न

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानवी शरीराला अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन्स अन्नद्रव्यांमधून पुरेशा मात्रेत मिळत नाही. परिणामी याची डिफीसेन्सी (कमतरता) आढळून येते. ही उणीव भरुन काढण्यासाठी दैनंदिन सेवनातील दूध व खाद्य तेलाला आणखी पौष्टिक केले जाणार आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेतला आहे. उत्पादकांना अमरावती येथे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.व्हिटॅमिन्सच्या (जीवनसत्व) कमतरतेमुळे अनेक आजार जडतात. प्रामुख्याने व्हिटॅमिन्स ए, डी व ई याची कमतरता खाद्य अन्नांमध्ये दिसत आहे. नैसर्गिक प्रक्रियेद्वारे व्हिटॅमिन्स शरीराला खाद्यान्नातून मिळणे आवश्यक आहे. हे व्हिटॅमिन्स नसल्याने गंभीर स्वरूपाचे आजार जडतात. मानवाच्या इंद्रियावर याचा गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो. डब्ल्यूएचओकडून याबाबत मोठे अभियानही राबविले जाते. दैनंदिन सेवनात येत असलेल्या दुधातून किंवा खाद्य तेलातून असे व्हिटॅमिन्स देता येईल का याचा शोध अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतला. त्यासाठी दूध व तेल उत्पादकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अमरावती येथे या संदर्भात कार्यशाळा झाली. विविध संस्थांनी व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख दूध उत्पादक, शासनाच्या या आव्हानाला प्रतिसाद देत फोर्टीफाईड दूध तयार करण्यासाठी पुढे आले आहे. यामध्ये वात्सल्य, रानडे, अमृतधारा, नमस्कार, हिंदूजा महिला को.आॅप. सोसायटी यांनी सहभाग घेतला. या प्रमाणेच तेल उत्पादकांमध्ये नेर, बोरीअरब, पुसद, वणी, दिग्रस येथील फर्मचा समावेश आहे.फोर्टीफाईड दूध व तेलसूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून व्हिटॅमिन्स ए, डी व ई ओळखले जाते. याची कमतरता दूर करण्यासाठी अतिरिक्त मात्रेत ते दूध व खाद्य तेलात शास्त्रशुद्ध पद्धतीने मिसळण्यात येते. अशा तेल व दुधाला शास्त्रीय भाषेत फोर्टीफाईड दूध, तेल म्हणून संबोधले जाते. याचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे.व्हिटॅमिन्सची कमतरता औषधातून भरुन काढण्याऐवजी फोर्टीफाईड दूध व तेलाचा पर्याय चांगला आहे. दैनंदिन सेवनातून शरीराची जीवनसत्त्वाची गरज भागविता येणार आहे. यासाठी उत्पादकांना सक्ती नाही, त्यानंतरही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.- गोपाल माुहरेअन्न निरीक्षक, यवतमाळ

टॅग्स :milkदूध