शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

क्रांतिदिनी उठले आंदोलनांचे वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 22:17 IST

९ आॅगस्टचा क्रांतिदिन हे औचित्य साधून राज्य सरकारचा सरता कालावधी लक्षात घेऊन विविध संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आवाज बुलंद केला. रोजीरोटीचा सवाल घेऊन जसे लोक रस्त्यावर उतरले, तसेच शैक्षणिक गुणवत्ता जपण्याच्या इरादा व्यक्त करीत ‘राष्ट्रनिर्माण रॅली’ही काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ९ आॅगस्टचा क्रांतिदिन हे औचित्य साधून राज्य सरकारचा सरता कालावधी लक्षात घेऊन विविध संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आवाज बुलंद केला. रोजीरोटीचा सवाल घेऊन जसे लोक रस्त्यावर उतरले, तसेच शैक्षणिक गुणवत्ता जपण्याच्या इरादा व्यक्त करीत ‘राष्ट्रनिर्माण रॅली’ही काढण्यात आली. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळी अंतर्गत आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटविण्यात आले. तर आशा सेविका, अंगणवाडीताई, महसूल कर्मचारी आदींच्या विविध मागण्यांनी वातावरण आंदोलनमय केले होते. तर त्याचवेळी काँग्रेसच्या वतीने ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’चा नारा देत आंदोलन छेडण्यात आले. दैनंदिन जगण्याचे प्रश्न, राजकीय आकांक्षा आणि समाजाभान जपणाऱ्यांनी एल्गार पुकारल्याचे यावेळी दिसून आले.‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ ही मोहीम तीव्र झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी या मोहिमेअंतर्गत यवतमाळात राष्ट्रनिर्माण रॅली काढण्यात आली. जिल्हाभरातून एकत्र आलेल्या नागरिकांची ही रॅली प्रचंड लक्षवेधी ठरली. शिस्तबद्ध वाटचाल आणि गुणवत्ता वाचविण्याचा आक्रोश यामुळे रॅलीने लक्ष वेधून घेतले. राज्य शासनाने अलिकडेच मराठा समाज आणि आर्थिक मागासांना आरक्षण लागू केले. त्यामुळे संविधानाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ७८ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याबद्दल यावेळी आवाज उठविण्यात आला. या राष्ट्रनिर्माण रॅलीमध्ये खुल्या प्रवर्गातील हजारो महिला-पुरुषांसह, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने बसस्थानक चौकात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’ असे नारे यावेळी देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आले. आशा स्वयंसेविकांनी वेतनाच्या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वात तिरंगा चौकात आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात अंगणवाडीतार्इंनी जिल्हा परिषदेपुढे एल्गार पुकारला. त्यांनी मानधनवाढ आणि पेन्शनसाठी जेलभरो आंदोलन केले. किसानसभेने कर्जमाफीसाठी धरणे दिले. आॅल इंडिया युथ फेडरेशनच्या नेतृत्वात २४ लाख रिक्त पदांच्या भरतीसाठी आंदोलन करण्यात आले. शिवाय प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी एक तास जादा काम करून प्रतिकात्मक आंदोलन केले. महसूलप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाºयांनीही प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन केले. जिकडे जावे तिकडे आंदोलनाचेच वातावरण असल्यामुळे शहरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. यवतमाळ शहरात सर्वत्र आंदोलनमय वातावरण असताना जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांमधील प्राध्यापकांनीही क्रांतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासूनच ‘नो पेमेंट नो वर्क’ हे अभिनव आंदोलन सुरू केले. क्रांतिदिनी पुढे आलेल्या मागण्यांवर शासन कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.आदिवासी दिनानिमित्त बाईक रॅलीक्रांतिदिनी सर्वत्र आंदोलने होत असताना आदिवासी समाजबांधवांनीही आपली अस्मिता जपली. ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळी यवतमाळ शहरातून दुचाकी रॅली काढली. शहरात फिरल्यानंतर तिरंगा चौकात रॅलीचा समारोप झाला. यावेळी मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Morchaमोर्चा