शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणीदार गावासाठी ‘तुफान आलया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:59 IST

पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसलेल्या अकोलाबाजारवासीयांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी कंबर कसली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्यासाठी अकोलाबाजारमध्ये सध्या तुफान आलया. बुधवारी सकाळी गावातून जलदिंडी काढून जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देअकोलाबाजार : रेणू शिंदे, स्वप्नील तांगडे यांच्यासह ग्रामस्थांचे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसलेल्या अकोलाबाजारवासीयांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी कंबर कसली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्यासाठी अकोलाबाजारमध्ये सध्या तुफान आलया. बुधवारी सकाळी गावातून जलदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांनी श्रमदानातून मोठ्या उत्साहात दगडी बांध बांधला.पाणी फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत अकोलाबाजारने सहभाग घेतला आहे. नऊ सदस्यांनी वाठोडा येथे चार दिवसीय प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर गावात कामाला सुरुवात केली. रोपवाटिका, माती परीक्षण, शोषखड्डे, शिवार फेरी आदी कामे केली जात आहे. यासाठी युवक, महिला, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत, पत्रकार आदींचा सहभाग लाभत आहे. गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे.जलदिंडीत गावकºयांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. जलदिंडीनंतर गाव शिवारातील नाल्यावर दगडी बांध बांधण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे, पंचायत समिती उपसभापती गजानन पाटील, नरेंद्र मोदी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, मंडळ अधिकारी राजेश नागलकर, तालुका समन्वयक समाधान इंगळे, परिसरातील मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, वैद्यकीय अधिकारी यांनी गावकºयांसह श्रमदान केले. जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाणी फाऊंडेशनचे नारे देत गावकºयांना प्रोत्साहित केले. उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पाणी फाऊंडेशनसंदर्भात मार्गदर्शन करून गावकºयांना श्रमदानाचे आवाहन केले.