शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ढाणकीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: December 2, 2015 02:46 IST

सततच्या नापिकीने शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही.

वाहतूक विस्कळीत : वीज, पीक विमा, धरणाचे पाणी सोडण्याची मागणी ढाणकी : सततच्या नापिकीने शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही. विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ढाणकी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांंनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.ढाणकीचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब चंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात निंगनूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य शांता राठोड, बिटरगावचे शिवशंकर पांढरे, ढाणकीचे पंचायत समिती सदस्य रमेश गायकवाड, ब्राह्मणगावचे जिल्हा परिषद सदस्य परमात्मा गरुडे, पंचायत समिती सदस्य मोहन नाईक, दत्तराव पिलवंड, रेखा मुरमुरे, अश्विनी राठोड यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ढाणकी येथे जुन्या बसस्थानकाजवळ हा रास्ता रोको करण्यात आला. बाळासाहेब चंंद्रे यांनी या आंदोलनाचे पार्श्वभूमी सांगितली. माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तातू देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी शेतकरी हितासाठी हा लढा आणखी तीव्र करू असे सांगितले. शेती पंपाला १६ तास सलग वीज पुरवठा करावा, जळालेल्या डीपी त्वरित बसवाव्या, खरीप हंगामाचा पीक विमा त्वरित मंजूर करावा, गाजेगाव-डोल्हारी रस्त्याचे काम त्वरित करावे, उमरखेड ते खरबी रस्त्याचे काम सुरू करावे, हरदडा-ब्राम्हणगाव-बोरी रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरूवात करावी, ढाणकी येथे १३२ केव्ही वीज वितरण केंद्र सुरू करावे आणि इसापूर धरणातील पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, छबूराव धोपटे, सुभाष कुचेरिया, भास्कर चंद्रे, अजीज खान पठाण, आनंदराव शेवाळकर, कविता कोकुलवार, शे.इब्राहीम शे. जबीर, बशीर भाई यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांंनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्तारोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)