शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

दिग्रसमध्ये मंगल कार्यालय संचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:39 IST

दिग्रस --- मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे मंगल कार्यालये ओस पडली. सध्या तीच अवस्था आहे. त्यात आणखी कडक ...

दिग्रस --- मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे मंगल कार्यालये ओस पडली. सध्या तीच अवस्था आहे. त्यात आणखी कडक निर्बंध लावल्यामुळे मंगल कार्यालये पांढरा हत्ती ठरले. त्यामुळे मंगल कार्यालय संचालकांवर वाईट वेळ आल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शहरातील मंगल कार्यालयात क्षमतेच्या ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी द्या अथवा मंगल कार्यालय संचालकांना आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मंगल कार्यालय संचालकांनी नायब तहसीलदार संजय राठोड यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन पाठविले. मंगल कार्यालय बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही. ग्रामीण भागात लग्न कार्य होतच आहेत. मोर्चे आणि इतर समारंभदेखील मोठ्या संख्येने होत आहेत. मात्र शहरातील मंगल कार्यालयावर कडक निर्बंध का आहे, असा प्रश्न आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, लॉज, बस यांमध्ये ५० टक्के मर्यादा निश्चित करून परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर मंगल कार्यालयालासुद्धा क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत योग्य काळजी घेऊन लग्न कार्य किंवा इतर समारंभाला परवानगी द्यावी अथवा आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना विविध मंगल कार्यालयांचे संचालक उपस्थित होते.