शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

राज्यस्तरीय बिरसा पर्वाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:39 IST

गैरआदिवासींनी खºया आदिवासी बांधवांच्या जागा काबिज केल्या. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गैरआदीवासींवर कारवाई करण्याचे निर्देश देऊन तीन महिने लोटले.

ठळक मुद्देगैरआदिवासींवर कारवाई कधी होणार? : शिवाजीराव मोघे यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गैरआदिवासींनी खºया आदिवासी बांधवांच्या जागा काबिज केल्या. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गैरआदीवासींवर कारवाई करण्याचे निर्देश देऊन तीन महिने लोटले. मात्र सरकारने पावले उचलली नाही. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने कायदा करावा, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी केले.ते यवतमाळातील समता मैदानावर आयोजित बिरसा पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके होते. खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, बिरसा पर्वाचे अध्यक्ष राजू चांदेकर तर प्रमुख अतिथी म्हणून अशोकराव चौधरी, अ‍ॅड. सुमित्रा वसावा, गडचिरोली येथील कुसुमताई अलाम, आदिवासी विकास परिषद अध्यक्ष कोवे, किरण कुमरे, बाबाराव मडावी, मिलिंद धुर्वे, जितेंद्र मोघे, प्रफुल्ल आडे, किशोर उईके, कृष्णा पुसनाके, शैलेश गाडेकर, बंडू मेश्राम उपस्थित होते.मोघे म्हणाले, आदिवासी बांधवांचे दैवत असलेल्या बिरसांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. बिरसांनी क्रांती केली. आपण संघटित होऊन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आवाज उठविला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. केवळ सरकारच्या भरवशावर राहू नका स्वत: पुढे यावे. प्रत्येकाने रोजगार उभारावा, तरच समाज पुढे जाईल, असे आवाहन त्यांनी केले. स्त्री शिक्षण आणि व्यसनमुक्तीवर काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. खासदार भावना गवळी यांनी ६ जुलैच्या निर्णयाबाबत आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असा शब्द यावेळी दिला. सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.किनवटचे माजी आमदार भीमराव केराम म्हणाले, गत अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासी बांधवांच्या सहा ते सात पिढ्या बरबाद झाल्या आहेत. समाज मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकवटले पाहिजे.जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे म्हणाल्या, १९ व्या शतकात बिरसाने सुशिक्षित समाजाची मुहर्तमेढ रोवली होती. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी लढा दिला. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना शिकविले पाहिजे. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी बिरसा मुंडांच्या स्मारकाकरिता नगरपरिषदेने प्रस्ताव मंजूर केल्याचे बिरसा पर्वात जाहीर केले. स्मारकासाठी जागा सूचविण्याची विनंती यावेळी त्यांनी केली.मोघे मुख्यमंत्र्यांवर बरसलेबिरसा पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर टीकेची तोफ डागली. मुख्यमंत्र्यांना कायद्याचे ज्ञान नाही. यामुळे सध्याचे सरकार निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही. कुठलाही निर्णय घेताना केवळ मान हलवून मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होतो. यामुळे या विषयात कायदाच व्हायला हवा, असे ते म्हणाले.परंपरागत वेशभूषेत स्वागतबिरसा पर्वाच्या उद्घाटनाला आदिवासी बांधवांच्या परंपरागत वेशभूषेने वेगळे महत्त्व आले होते. कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे स्वागतही परंपरागत नृत्यातून करण्यात आले. यावेळी सादर झालेल्या दंडार नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.