शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या घरकुलात राज्य सरकारची कपात; सातशे घरकुले घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 13:18 IST

अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या कातकरी, माडिया गोंड व कोलाम जमातीच्या नागरिकांना घरकुल बांधून दिले जाते. त्यासाठी डोंगरी व नक्षलप्रवण भागात प्रति घरकूल एक लाख ४२ हजारांचा निधी दिला जातो.

ठळक मुद्देकपातीचे दोर प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हाती

अविनाश साबापुरे

यवतमाळ : राज्यातील आदिम जमातीच्या गोरगरीब नागरिकांसाठी राज्य शासनाने ४१४४ घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले होते. मात्र काटकसरीच्या नावाखाली अवघ्या महिनाभरात हे उद्दिष्ट घटवून ३३९० करण्यात आले. त्यामुळे ११ जिल्ह्यातील ७५४ गोरगरिबांना यंदा घरकुलापासून वंचित रहावे लागणार आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील कातकरी, माडिया गोंड व कोलाम जमातीच्या नागरिकांसाठी आदिम जमाती विकास योजनेअंतर्गत घरकुल योजना राबविली जाते. २०२१-२२ या वर्षासाठी शासनाने २४ जानेवारी २०२२ रोजी घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले. त्यासाठी आदिवासी विकास आयुक्तांमार्फत ग्रामीण गृहनिर्माणच्या राज्य व्यवस्थापन कक्षाकडे ५४९९.७८ लाखांचा निधी तत्काळ वर्ग करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, अवघ्या महिनाभरातच सरकारला कोरोना काळातील आर्थिक तंगीची आठवण झाली आणि ३१ जानेवारी रोजी निर्णय फिरविण्यात आला. त्यानुसार घरकुलांचे उद्दिष्ट ४१४४ वरून ३३९० इतके कमी करण्यात आले. घरकुल बांधकामासाठी निधीचे उद्दिष्टही ४४९९.७० लाख असे कमी करण्यात आले.

ही योजना यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ११ जिल्ह्यातील आदिम जमातींसाठी राबविली जाते. अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या कातकरी, माडिया गोंड व कोलाम जमातीच्या नागरिकांना घरकुल बांधून दिले जाते. त्यासाठी डोंगरी व नक्षलप्रवण भागात प्रति घरकूल एक लाख ४२ हजारांचा निधी दिला जातो. संबंधित आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जाते. मात्र यंदा राज्य शासनाने या योजनेचा निधी कपात करून तब्बल साडेसातशे घरकुलांचे उद्दिष्टही कमी केल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यातही नाशिक, रत्नागिरी, गडचिरोली येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थिती पाहून या उद्दिष्टात बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

जिल्हानिहाय घरकुलांचे उद्दिष्ट

जिल्हा : आधी : आता

यवतमाळ : २५५७ : २०९२

वर्धा : ११७ : ९६

चंद्रपूर : ८९ : ७३

गडचिरोली : १३४ : ११०

नाशिक : ६७ : ५६

ठाणे : ३२८ : २६८

पुणे : ४३ : ३६

पालघर : ४१३ : ३३७

रायगड : ३७९ : ३१०

रत्नागिरी : ०७ : ०५

सिंधुदुर्ग : १० : ०८

एकूण : ४१४४ : ३३९०

टॅग्स :GovernmentसरकारHomeसुंदर गृहनियोजन