शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

यवतमाळ जिल्ह्यातील ३९ राष्ट्रीय खेळाडूंना राज्य शासनाची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:50 IST

जिल्ह्यातील ३९ खेळाडूंनी सन २०१८-१९ या सत्रात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख ४४ हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला.

ठळक मुद्देप्रावीण्य व सहभागाचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ३९ खेळाडूंनी सन २०१८-१९ या सत्रात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख ४४ हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला.राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त आणि सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक खेळाडूंना ११ हजार २५० रुपये, द्वितीय क्रमांक आठ हजार ९५०, तृतीय क्रमांक सहा हजार ७५०, तर सहभागाबद्दल तीन हजार ७५० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.२०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील सात खेळाडूंनी विविध खेळात प्रथम, पाच खेळाडूंनी द्वितीय, तर सात खेळाडूंनी तृतीय क्रमांक प्राप्त करत महाराष्ट्र संघाला पदक प्राप्त करून दिले. २० खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभाग घेतला, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिली.या खेळाडूंची शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. खेळाडूंशी संबंधित शाळेच्या शिक्षकांनी अर्ज व बँक पासबूकच्या झेरॉक्ससह कार्यालयात संपर्क करून शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राठोड यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करता येईल.

शिष्यवृत्ती प्राप्त खेळाडू१४ वर्षे वयोगट - हर्ष चव्हाण, सानिका रोकडे, अमन राजा, दीप गाबडा, अनुष्का नागरमोथे, मयांक काळे, प्रशांत चव्हाण, वृंदा सोनटक्के, खुशी जाधव, तनुश्री कडू, क्षितिज टोणे, कार्तिकी येंडे.

१७ वर्षे वयोगट - सायली वझाडे, इशाका पाटील, मानसी इखे, नंदिनी पाटील, आरोही भगत, अमितेश बोदडे, अभिलाष टेके, देवांशू बाळबुद्धे, तन्मय पुरके, स्वर पोतदार, तेजस भगत, अंजली गुप्ता, तन्मय पुरके, सेजल जाधव. १९ वर्षे वयोगट - रितेश राऊत, देवयानी नित, हर्षल धाबर्डे, साक्षी शिरसाट, प्राची सोनारकर, राज बागडिया, रेवती कोकरे, हर्षल खामनकर, यशस्विनी कुंथळकर, सुयोग मोरे, नीमिषा राजगुरे.

टॅग्स :Governmentसरकार